पशाची चिंता नाही, हवी फक्त जिद्द..

पशाची चिंता नाही, हवी फक्त जिद्द..

देशात रस्ते किती झाले यापेक्षा,...

पशाची चिंता नाही, हवी फक्त जिद्द..
 नेरळमध्ये घराची भिंत कोसळून पाच जण ठार

नेरळमध्ये घराची भिंत कोसळून पाच जण ठार

रायगड – जिल्ह्यातील कर्जतजवळील...

 नेरळमध्ये घराची भिंत कोसळून पाच जण ठार
चित्त थरारक स्टंट

चित्त थरारक स्टंट

यवतमाळ – येथील ब्रदर्स एट  आर्म्स...

चित्त थरारक स्टंट
गोंदियात धावत्या नॅनोला लागली आग

गोंदियात धावत्या नॅनोला लागली आग

गोंदिया – आमगाव रोडवरील अदासी जवळ...

गोंदियात धावत्या नॅनोला लागली आग

Archive for January, 2015

निती’ आयोगाच्या टीमची घोषणा 0

निती’ आयोगाच्या टीमची घोषणा

NITI-Aayog1-300x254
नवी दिल्ली- गेल्या ६४वर्षाचा इतिहास असलेला नियोजन आयोग मोडीत काढून त्याजागी नव्याने निर्माण करण्यात आलेल्या ‘निती’ आयोगाच्या उपाध्यक्षपदी कोलंबिया विद्यापीठातील प्राध्यापक व नामवंत अर्थतज्ज्ञ अरविंद पानगरिया यांची नेमणूक करण्यात आली आहे.
या आयोगामध्ये अर्थतज्ज्ञ विवेक देबरॉय आणि माजी संरक्षण सचिव डॉ.व्ही.के.सारस्वत यांची पूर्ण वेळ सदस्य म्हणून नियुक्त करण्यात आली आहे. तर केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह, अरुण जेटली, सुरेश प्रभू आणि राधा मोहनसिंह, नितीन गडकरी, स्मृती इराणी, थावरचंद गेहलोत हे आयोगातील अन्य सदस्य असणार आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्यदिनी केलेल्या भाषणात ६४ वर्षाचा इतिहास असलेला नियोजन आयोग मोडीत काढण्याची घोषणा केली होती. ही व्यवस्था कालबाह्य झाली असून त्याऐवजी सध्याच्या गरजांसाठी लवकरच नवीन संस्था त्याची जागा घेईल, असे त्यांनी सांगितले होते.
सात डिसेंबरला पंतप्रधान मोदींनी यासंबंधी मुख्यमंत्र्यांची बैठक बोलावली होती. या बैठकीत काही जणांनी नियोजन आयोगाच्या ऐवजी दुसरी नवीन यंत्रणा तयार करण्याचा निर्णयाला सहमती दर्शवली तर काही काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांनी यास विरोध केला होता.
तसेच यापूर्वी नियोजन आयोगाच्या जागी उभारण्यात येणा-या नव्या संस्थेबाबत पंतप्रधानांनी लोकांना नव्या कल्पना सुचविण्यास पंतप्रधान मोदींनी सांगितले होते. नव्या संस्थेबाबत नवीनवीन संकल्पना तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचवाव्यात’, असे मोदींनी ट्विटरद्वारे सांगितले होते. तसेच यासाठीची लिंकही त्यांनी ट्विटरवर पोस्ट केली होती.

 

January 05, 2015 in मुख्य पान
 आंदोलकांवरील खटले मागे 0

आंदोलकांवरील खटले मागे

BJP protest demanding the arrest of Shabir Khan
मुंबई – राजकीय आणि सामाजिक आंदोलनांमुळे गुन्ह्यांमध्ये अडकलेल्या अनेक कार्यकर्त्यांना दिलासा देणारा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. २००५ ऐवजी २०१४ पर्यंतचे अशा प्रकारचे गुन्हे मागे घेण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत घेण्यात आला.
राजकीय व सामाजिक आंदोलनामध्ये १ मे २००५ पूर्वी दाखल झालेले व प्रलंबित असलेले खटले ७ जुलै २०१० च्या शासन निर्णयान्वये मागे घेण्याचा निर्णय यापूर्वीच घेण्यात आला आहे. हे खटले मागे घेण्याची तारीख आता १ मे २००५ ऐवजी १ नोव्हेंबर २०१४ पर्यंत वाढविण्यास आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे.

January 05, 2015 in मुख्य पान
राजकीय पक्षांना मालमत्ता जाहीर करण्याचे आदेश 0

राजकीय पक्षांना मालमत्ता जाहीर करण्याचे आदेश

prashna-tatvancha-jpg
नवी दिल्ली- देशातील लोकशाही बळ करण्यात महत्त्वाची भूमिका बजावणा-या राजकीय पक्षांनी आपल्या जमिनी व बंगले संदर्भातील सर्व कागदपत्रे जाहीर करावीत, तसेच ही माहिती वेबसाइटवर टाकावी, असे आदेश केंद्रीय माहिती आयोगाने केंद्रीय नगरविकास खात्याला दिले आहेत.
राजकीय पक्षांच्या नावावरील जमीन व बंगले असल्यास त्यांनी त्याची माहिती वेबसाइटवर टाकणे बंधनकारक केले आहे. केंद्रीय माहिती आयोगाने केंद्रीय सार्वजनिक माहिती अधिका-याला सर्व नोंदणीकृत राजकीय पक्षांशी संबंधित सर्व कागदपत्रे, पत्रव्यवहार, मार्गदर्शक तत्वे आणि अधिसूचना आदींची माहिती चार आठवडयात सादर करण्याचे आदेश दिले. तसेच नगरविकास खात्याकडून सर्व पक्षांची माहिती जाहीर करण्यास सांगितले आहेत.
सामाजिक कार्यकर्ते सुभाष अग्रवाल यांनी राष्ट्रीय जनता दलाच्या मुख्यालयाचे नामकरण ‘राबडी भवन’ केल्याप्रकरणी केंद्रीय माहिती आयोगाकडून माहिती मागवली होती. त्याला पक्षाचे नेते नवलकिशोर राय यांनी हरकत घेतली होती. त्यामुळे अग्रवाल यांना माहिती मिळाली नाही. त्यामुळे त्यांनी नगरविकास खात्याकडे धाव घेतली. तेथेही त्यांची निराशा झाली. बिहार सरकारने राजद पक्षाला पाटणा किंवा अन्य राज्यांमध्ये भूखंड दिला आहे का याची माहिती अग्रवाल यांना हवी होती. नगरविकास खात्याने दिलेल्या माहितीनुसार, नवी दिल्लीत राजदला कोणताही भूखंड दिलेला नाही, अशी माहिती मिळाली.

January 04, 2015 in मुख्य पान
संशयातून पत्नीचा खून 0

संशयातून पत्नीचा खून

download (5)
पुणे – मृतावस्थेत सापडलेल्या दाम्पत्याचे मृत्यूचे कारण स्पष्ट झाले असून चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा खून केल्यानंतर पतीने स्वत: आत्महत्या केल्याचे उघडकीस आले आहे. कोथरूडमधील किष्किंधानगर येथे गुरुवारी दुपारी तीनच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला. दीपक हरी जाधव (वय ३१) आणि त्याची पत्नी तेजश्री (२०, रा. किष्किंधानगर, कोथरूड) हे दोघे मृतावस्थेत सापडले होते. दीपकने तेजश्री हिच्यावर चारित्र्याचा संशय घेऊन गळा दाबून तसेच डोक्यावर मारहाण करून तिचा खून केला. त्यानंतर स्कार्फच्या सहाय्याने स्वत: गळफास घेतला, अशी माहिती कोथरूड पोलिसांनी दिली.
बुधवारी ३१ डिसेंबर रात्रीपासून हे दोघे शेजाऱ्यांना दिसले नव्हते. त्यानंतर शुक्रवारी दुपारी ही घटना उघडकीस आली. तेजश्री हिच्या दोन्ही हातांना आणि गळ्याजवळ रक्ताचे डाग होते. त्यामुळे दीपकने आपल्या हाताच्या शिरा कापून घेतल्यानंतर तिचा गळा दाबला असावा, त्यानंतर तिला डोक्यावर मारहाण करून खून केल्यानंतर गळफास घेतला असावा, असे पोलिसांनी सांगितले. तेजश्री ही दीपकची दुसरी पत्नी असून सुमारे एक वर्षापूर्वी या दोघांनी प्रेमविवाह केला आहे. त्याची पहिली पत्नी विभक्त झाली आहे. दीपक आणि त्याच्या पहिल्या पत्नीची दोन मुलेही आहेत.

January 04, 2015 in मुख्य पान
निलेश राणे पोलिसांच्या ताब्यात 0

निलेश राणे पोलिसांच्या ताब्यात

M_Id_237652_Nilesh_Rane
रत्नागिरी – रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या विरोधात घोषणाबाजी करत त्यांच्या गाड्यांचा ताफा अडवू पाहणारे काँग्रेस नेते निलेश राणे आणि त्यांच्या ५० कार्यकर्त्यांना रत्नागिरी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. चौकशी करून त्यांना सोडण्यात येईल माहिती मिळते आहे.
रत्नागिरी येथे रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांचा जाहीर सत्कार कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमासाठी सुरेश प्रभू रत्नागिरी शहरात सकाळी दाखल होणार हे लक्षात घेऊन निलेश राणे यांच्या नेतृत्वाखाली ५० काँग्रेस कार्यकर्त्यांनी सकाळपासून आंदोलन केले. कोकण रेल्वेच्या प्रश्नांकडे सुरेश प्रभू दुर्लक्ष करत असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला. सकाळी दहाच्या सुमारे निलेश राणे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी मार्ग रोखून धरण्याचा प्रयत्न केला. यावेळी रत्नागिरी पोलिसांनी कारवाई करत निलेश राणे यांच्यासह ५० जणांना ताब्यात घेतले.

January 04, 2015 in मुख्य पान
पत्रकादिनानिमित्य व्याख्यान, कवी संमलन 0

पत्रकादिनानिमित्य व्याख्यान, कवी संमलन

IMG-20140829-WA0005
आर्णी, दि.४ – आद्य पत्रकार, दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती व पत्रकादिनाचे औचित्य साधून आर्णी प्रेस क्लबच्या वतीने व्याख्यान व कवी संमेलनाचे आयोजन ६ जानेवारी रोजी माहेर मंगल कार्यालयात केले आहे.
सकाळच्या सत्रात ‘सायबर क्राईम समस्या आणि आव्हान’ या विषयावर न्या उमेशचंद्र मोरे यांचे व्याख्यान होणार आहे. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून न्या. काळपगार, तहसीलदार , ठाणेदार हनुमंत गायकवाड, गटविकास अधिकारी प्रकाश नाटकर उपस्थितीत होते. इंटरनेचा वाढता वापर त्यातून चुकीच्या संदेशामुळे निर्माण होणारी स्थिती आदी बाबींवर हे व्याख्यान महत्वपूर्ण ठरणार आहे. सायंकाळी ६ वाजता मराठी कविता गझलची बहारदार काव्य मैफल होणार आहे. सुप्रसिध्द वºहाडी कवी शंकर बडे यांच्या अध्यक्षतेखाली प्रा. कलीम खान, बबन सराडकर, नितीन देशमुख, तुळशीदास खराटे, मसुद पटेल, आबेद शेख, विजय ढाले यांचा सहभाग असेल. कार्यक्रमाचे संचालन गझलकार प्रा. रवी चापके हे करतील. या कार्यक्रमाला उपस्थित राहावे असे आवाहन आर्णी प्रेसचे अध्यक्ष संदीप ढोले, उपाध्यक्ष नौशाद अली, सचिव संजय राठोड, संस्थापक प्रमोद कुदळे, हरिओम बघेल, विवक दहिफळे, सचिन शिंदे, बबलू जाधव, संजय जोशी, विनोद सोयाम आदीनी केले आहे.

January 04, 2015 in विदर्भ
स्टेट बॅकेत चोरीचा प्रयत्न 0

स्टेट बॅकेत चोरीचा प्रयत्न

images
बाभुळगाव, दि. ४ – येथील स्टेट बँक आॅफ इंडियाचे अज्ञात चोरट्यांनी दोन कुलपे तोडून चोरीचा प्रयत्न केल्याची घटन काल मध्यरात्री घडली.
३ जानेवारीच्या मध्यरात्रीनंतर अज्ञात चोरट्यांनी येथील स्टेट बँक शाखेच्या मागील लोखंडी ग्रील व दाराचे कुलुप तोडून बँकेच्या आत प्रवेश केला. मात्र त्यांच्या हाती काहीच लागले नाही. आज सकाळी संदेश वाहक राजगडकर यांच्या निदर्शनात हा प्रकार आला. त्यांनी त्वरीत शाखा व्यवस्थापक विश्वकांत निमजे यांना फोनद्वारे माहिती दिली. विश्वकांत निमजे यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी भादंवि कलम ४५७, ३८०, ५११ अन्वये चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला. घटनास्थळी ठाणेदार महिपालसिंग चांदा यांनी भेट दिली. विषेश म्हणजे या बँकत रात्रीच्या वेळी कुठलाही चौकीदार ठेवण्यात आला नाही. एक चतुर्थ श्रेणी कर्मचारी वगळता कुठलाही कर्मचारी, अधिकारी मुख्यालयी राहत नाही. सर्वजण बाहेर गावाहुनच अप-डाऊन करतात. त्यामुळे सदर बँक रामभरोसे सोडली असल्याची चर्चा आज दिवसभर परिसरात होती.

January 04, 2015 in विदर्भ
बाभुळगावचे ठाणेदार महिपालसिंग चांदा 0

बाभुळगावचे ठाणेदार महिपालसिंग चांदा

2014-07-04~police_logo_ns
बाभुळगाव, दि. ४ – तब्बल दिड महिन्यांपासुन रिक्त असलेल्या बाभुळगाव पोलिस स्टेशनच्या ठाणेदारपदी महिपालसिंग चांदा रूजु झाले आहेत. त्याच प्रमाणे मुंबई येथुन बदलुन आलेले सहाय्यक पोलिस निरीक्षक अशोक हुलगे हे ही रूजु झाले आहेत. तर प्रभारी ठाणेदार समाधान धंदरे यांना यवतमाळ ग्रामिणची जबाबदारी देण्यात आली आहे.
दोन अधिकाºयांची नियुक्ती झाली असली तरी अद्याप पोलिस उपनिरिक्षकाची जागा रिक्त असुन बदलीवर गेलेल्या अनेक पोलिस कर्मचाºयांच्या जागी नवीन कर्मचारी आलेले नाहीत. त्यामुळे तोडक्या कर्मचाºयाच्या भरोशावर तालुक्यातील ९४ गावांचा कारभार चालत आहे.

January 04, 2015 in विदर्भ
११ हजार उमेदवारांनी दिली परिचरपदाची परीक्षा 0

११ हजार उमेदवारांनी दिली परिचरपदाची परीक्षा

2014-11-05exmp_ns
यवतमाळ, दि. ४ – जिल्हा परिषदेच्या वतीने घेण्यात आलेल्या परिचरपदाच्या लेखी परीक्षेचा पेपर ११ हजार उमेदवारांनी सोडविला. जिल्ह्यातील ९० केंद्रावर दुपारी २ ते ३.३० वाजताच्या दरम्यान ही परीक्षा पार पडली. परीक्षेदरम्यान अनुचित घटना घडू नये म्हणून परीक्षा केंद्रावर कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
यापूर्वी पेपर फुटल्यामुळे आजच्या परीक्षेकडे तब्बल सात हजार उमेदवारांनी पाठ फिरविली. यापूर्वी २२ नोव्हेंबर रोजी परिचरपदासाठी लेखी परीक्षा घेण्यात आली होती. मात्र विस्तार अधिकाºयाने पेपर फोडल्यामुळे परीक्षा रद्द करण्याची नामुष्की जिल्हा परिषद प्रशासनावर ओढवली होती. रद्द करण्यात आलेली परीक्षा पुन्हा घेण्यात येत असल्याने प्रशासनावर कमालीचा ताण आला होता. या परीक्षेला कुठल्याही प्रकारचे गालबोट लागू नये म्हणून प्रशासनाकडून योग्य ती खबरदारी घेण्यात आली. परिचरपदाच्या ४५ जागांसाठी १८ हजार १५३ उमेदवार लेखी परीक्षेसाठी पात्र ठरले होते. त्यापैकी ११ हजार २६४ उमेदवारांनी परीक्षा दिली. तब्बल ६ हजार ८८९ उमेदवारांनी परीक्षेकडे पाठ फिरविली. पेपर फुटीमुळे उमेदवारांनी परीक्षेला गैरहजर राहने पसंत केल्याचे सांगण्यात येते. उपस्थित विद्यार्थ्यांची टक्केवारी ४० च्या घरात आहे. बंदुकधारी पोलीस व संपर्क अधिकारी यांच्या सुरक्षेत पेपर परीक्षा केंद्रावर पोहोचवण्यात आले. यवतमाळ शहरात ४३ परीक्षा केंद्र होते. तर कळंब, बाभूळगाव, राळेगाव, घाटंजी, आर्णी, दारव्हा, नेर तालुक्यात ४७ केंद्रावर परीक्षा घेण्यात आली.

January 04, 2015 in रोजगार, विदर्भ
ट्रक चोरट्यांना अटक, एसडीपीओची कारवाई 0

ट्रक चोरट्यांना अटक, एसडीपीओची कारवाई

IMG-20150104-WA0036

यवतमाळ, दि. ४ – ढेपीचा ट्रक चोरून नेणाºया ट्रक चोरट्यांना एसडीपीओच्या पथकाने वरोरा येथे अटक केली असून, शाहरुख बिसमिल्ला खॉ (१९), शहजाद खॉ शम्मी खॉ पठाण (१९) रा. दोघेही इंदीरा नगर असे अटकेतील आरोपींची नावे असून, फरार असलेल्या दोघांचा पोलीस शोध घेत आहे.
शहरातून ३० डिसेंबरला ट्रक चोरी झाल्याची घटना घडली होती. चार चोरट्यांनी संगणमत करून १४ लाख रुपयांची ढेप असलेला ट्रक पळविला होता. याबाबतची पोलीस स्टेशनला तक्रार दाखल झाल्यानंतर याप्रकरणाचा तपास सुरू होता. दरम्यान चोरटे वरोºयात असल्याची माहिती एसडीपीओ राहुल मदने यांच्या पथकाला मिळाली. त्यांनी वरोरा गाठून वरील दोन चोरट्यासह मुद्देमाल जप्त केला आहे. फरार असलेल्या दोन चोरट्यांचा शोध घेण्यात येत असून, ही कारवाई एसडीपीओ राहुल मदने, एपीआय सारंग मिरासे, इकबाल शेख,   प्रमोद मडावी, संतोष मडावी, बंडू मेश्राम, नीलेश राठोड, सुरेश कांबळे  आदींनी केली.

January 04, 2015 in विदर्भ
फुले आणि कांशीराम यांना भारतरत्न देण्याची मागणी 0

फुले आणि कांशीराम यांना भारतरत्न देण्याची मागणी

pic
लखनऊ – जर केंद्र सरकार मालवीय यांना मरणोत्तर भारतरत्न देऊ शकते तर महात्मा जोतिबा फुले आणि कांशीराम यांनाही मरणोत्तर भारतरत्न देऊन गौरविण्यात यावे अशी मागणी बहुजन समाज पक्षाच्या अध्यक्षा मायावती यांनी लखनऊ येथे पत्रकार परिषदेत केली.
भाजप हा जातीयवादी पक्ष आहे. केंद्रातल्या भाजपच्या सरकारने एकाच जातीच्या दोन व्यक्तींना भारतरत्न हा देशातील सर्वोच्च नागरी सन्मान जाहीर केला आहे. मात्र दलित किंवा अन्य मागासवर्गीयांचा या पुरस्कारासाठी विचार केलेला नाही, असे मायावती म्हणाल्या. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यानंतर दलितांच्या उद्धारासाठी कांशीराम भरपूर काम केले. त्यामुळे हे योगदान लक्षात घेऊन कांशीराम यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार देण्याची मागणी मायावती यांनी केली. दलित, मागासवर्गीय आणि महिलांच्या शिक्षण तसेच समानतेसाठी अखेरच्या श्वासापर्यंत अविरत काम करणा-या महात्मा जोतिबा फुले यांचाही मरणोत्तर भारतरत्न पुरस्काराने गौरव करण्याची मागणी मायावती यांनी केली.
माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी आणि पंडित मदनमोहन मालवीय यांना २५ डिसेंबर २०१४ रोजी भारतरत्न पुरस्कार जाहीर झाला आहे. प्रजासत्ताक दिनी हा भारतरत्न प्रदान केला जाणार आहे. या पार्श्वभूमीवर बसपच्या अध्यक्षा मायावती यांनी केंद्रातल्या मोदी सरकारच्या भारतरत्न संदर्भातल्या निर्णयावर टीका केली.

January 03, 2015 in मुख्य पान
‘गुंड आणून तुझे हातपाय तोडतो’, आयुक्ताकडून गटनेत्याला धमकी 0

‘गुंड आणून तुझे हातपाय तोडतो’, आयुक्ताकडून गटनेत्याला धमकी

commissioner
औरंगाबाद – ‘माझ्या धुळ्यातील सर्व गुंड आणून तुला ठोकून, हातपाय तोडून फेकून द्यायला लावतो. यापुढे तू कसा जगतो आणि तुला कोण जगवतो ते मी पाहतो,’ अशा शब्दांत पालिकेचे आयुक्त प्रकाश महाजन यांनी भारतीय जनता पक्षाचे महापालिकेतील गटनेते संजय केनेकर यांना धमकावले. या प्रकारामुळे केनेकर यांनी सिटी चौक पोलिस ठाण्यात तक्रार देऊन पोलिस संरक्षण मागितले आहे.
सिटी चौक पोलिस स्टेशनच्या पोलिस निरीक्षकांच्या नावे दिलेल्या निवेदनात केनेकर यांनी म्हटले आहे की, ‘२ जानेवारी रोजी दुपारी बारा वाजता पालिका आयुक्त प्रकाश महाजन यांच्या दालनात जात असताना दोन सुरक्षा रक्षकांनी मला रोखले. आयुक्तांच्या दालनात आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. जयश्री कुलकर्णी आणि आयुक्त आहेत. कोणालाही आत सोडू नका, असे आयुक्तांचे आदेश आहेत, असे रक्षकांनी सांगितल्यामुळे परत फिरून मी दुसऱ्यांदा आयुक्तांना भेटण्यासाठी गेलो. रक्षकांनी मला पुन्हा परत पाठवले.’
‘तिसऱ्यांदा गेलो तेव्हा पालिकेचे कर्मचारी डीएच्या मागणीसाठी तेथे आले होते. मी आपणाशी बोलू शकतो का, असे आयुक्तांना विचारले. लवकर बोला मला वेळ नाही, असे ते म्हणाले. डीएची मागणी करणाऱ्या कर्मचाऱ्यांबरोबर वृत्तपत्रांचे छायाचित्रकारही आयुक्तांच्या दालनात आले. त्यावेळी आयुक्तांनी सर्व कर्मचाऱ्यांना खालच्या भाषेत शिवीगाळ केली. ‘या सर्वांना बाहेर काढा,’ असे त्यांनी सुरक्षारक्षकांना फर्मावले. अशा भाषेत बोलू नका, अशी विनंती मी केली. तेव्हा ‘तुम्ही या सर्वांचे वकिलपत्र घेऊन आलात का,’ असा प्रश्न त्यांनी केला. ‘माझ्या कर्मचाऱ्यांशी कसे बोलायचे हे तुम्ही मला शिकवू नका,’ असे म्हणत ‘अरे यालापण बाहेर काढा,’ असे आदेश आयुक्तांनी सुरक्षारक्षकांना दिले. तुम्ही मला अशा भाषेत बोलू शकत नाहीत, असे मी आयुक्तांना म्हणालो. तेव्हा त्यांनी आर्वाच्च भाषेत शिवीगाळ केली. ‘माझ्या धुळ्यातील सर्व गुंड आणून तुला ठोकून हातपाय तोडून फेकून द्यायला लावतो. यापुढे तू कसा जगतो आणि तुला कोण जगवतो ते पाहतो,’ अशी धमकी दिली. धमकी देणाऱ्या अशा या विक्षिप्त माणसाकडून मला भीती वाटत आहे. माझ्या जीवाला धोका असल्यामुळे आयुक्तांच्या विरोधातली माझी तक्रार नोंदवून घ्यावी व मला पोलिस संरक्षण द्यावे,’ असेही या निवेदनात म्हटले आहे.
सिटी चौक पोलिसांनी संजय केनेकर यांच्या तक्रार अर्जाची नोंद घेतली आहे. या संदर्भात आयुक्त महाजन यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

 

January 03, 2015 in मुख्य पान

आरक्षण विधेयक मंजूर करा!, मुस्लीम बांधवांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

यवतमाळ – मुस्लीम समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी निर्गमित केलेल्या आरक्षणाचे विधेयक हिवाळी अधिवेशनात मांडण्यात आले नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या मुस्लीम बांधवानी आज शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून आरक्षणाचे विधेयक मंजूर करण्यात यावे, अशी मागणी राज्याच्या मुख्यमंत्र्याकडे निवेदनातून केली.
मुस्लीम व मराठा आरक्षणाबाबत अधिसुचना निर्गमित केल्यानंतर अधिसुचनेचे विधेयक हिवाळी अधिवेशनात मांडले जाईल अशी अपेक्षा व्यक्त होत होती. मात्र सरकारने केवळ मराठा आरक्षण विधेयक पारीत करून मुस्लीम समाजावर अन्याय केला असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. न्या. राजेंद्र सच्चर समिती, रंगनाथन मिश्र आयोग, व न्या. रहेमान समितीच्या अहवालानुसार मुस्लिम समाजाची स्थिती अत्यंत विदारक आहे. त्यावरूनच शासनाने एसबीसी (ए) ची अधिसुचना निर्गमित केली होती. मात्र सरकारने विधेयक अधिवेशनात न मांडल्यामुळे समाजावर अन्याय झाला आहे. सरकारने विधेयक मंजूर करण्यासाठी विधीमंडळाचे विशेष अधिवेशन बोलावून मुस्लिम समाजाला न्याय द्यावा, अशी मागणी जिल्हाधिकारी यांच्या मार्फ त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठविण्यात आलेल्या निवेदनातून करण्यात आली. यावेळी आ. ख्वाजा बेग, आरीफ काझी, मुबारक तंवर, आरीज बेग, सैय्यद फारूख, तारीक लोखंडवाला, बाबूसेठ इसानी, इनायतउल्ला जनाब, ऐजाज जोश, सय्यद निसार, सलीम सोळंकी यांच्यासह मुस्लीम समाज बांधव उपस्थित होते.

January 03, 2015 in विदर्भ

अतिक्रमणावर बुलडोजर, तीनशे दुकाने हटवले

यवतमाळ – अतिक्रमणाने वेढलेल्या शहराचा चेहरा मोहरा बदलविण्यासाठी प्रशासनाने अतिक्रमण हटाव मोहिमेस प्रारंभ केला आहे. आज शनिवारी आर्णी मार्गावरील तब्बल अडीचशे दुकानांनवर बुलडोजर चालविण्यात आला. यावेळी व्यवसायिकांनी उपासमारीचा प्रश्न उपस्थित करीत अतिक्रमण हटविण्यास विरोध केल्याने तणाव निर्माण झाला होता. मात्र अधिकाºयांनी पोलीस बंदोबस्तात अतिक्रमण हटविण्याची कारवाई केली.
शहारातील चौका – चौकात व्यवसायिकांनी दुकाने थाटल्याने रहदारीचा व वाहतुकीचा प्रश्न गंभिर झाला आहे. गेल्या दोन वर्षात नगर पालिके ने अतिक्रमण हटविण्यासंदर्भात ठोस कारवाई न केल्याने या कालावधीत शहरात मोठ्या प्रमाणात अतिक्रमण वाढले. नगर पालिका, महसूल व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या जागेसह रस्त्यावर व्यवसायीकांनी व्यवसाय मांडल्याने नागरीकांना जीव मुठीत धरूनच मार्गक्रमण करावे लागत आहे. अतिक्रमणामुळे शहराचा चेहरा देखील विद्रुप झाला आहे. गेल्या दोन वर्षापासून अतिक्रमण हटाव मोहिम राबविण्याची मागणी जनतेमधून होत होती. दरम्यान नवीन वर्षात अतिक्रमण हटविण्याचा मुहूर्त नगर पालिकेला सापडला. आज शनिवारी आर्णी मार्गावरील पानटपºया, चहाकॅटीनसह किरकोळ व्यवसायिकांची दुकाने हटविण्यात आली. अतिक्रमण हटविण्याची कारवाई सुरू असताना, व्यवसायीकांनी याला विरोध दर्शविल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे पोलीस बंदोबस्तात अधिकाºयांना अतिक्रमण हटविण्याची कारवाई करावी लागली. आज पासून प्रारंभ झालेली अतिक्रमण हटाव मोहिम १५ जानेवारीपर्यंत राबविण्यात येणार आहे. पहिल्यादिवशी वडगाव ग्रामपंचायत हद्दीपासून अतिक्रमण हटविण्यास सुरुवात झाली. सायंकाळपर्यंत आर्णी नाक्यावरील पोलीस चौकीपर्यंत अतिक्रमण हटविण्यात आले होते. या मोहिमेत नगर पालिकेचे मुख्याधिकारी, दीपककुमार मिना, रविंद्र पांढरे, उपविभागिय अधिकारी नरेंद्र टापरे, तहसीलदार अनूप खांडे, पोलीस निरीक्षक बाळकृष्ण जाधव यांच्यासह बांधकाम विभागाचे अधिकारी उपस्थित होते. कुठलिही अनुचित घटना घडू नये म्हणून मुख्य मार्गावर कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

 

January 03, 2015 in विदर्भ
पत्रकार दिनानिमित्त स्पर्धा परिक्षा मार्गदर्शन व वादविवाद स्पर्धा 0

पत्रकार दिनानिमित्त स्पर्धा परिक्षा मार्गदर्शन व वादविवाद स्पर्धा

download

नेर – येथे  राष्ट्रीय महाराष्ट्र पत्रकार संघाचे वतीने ६ जानेवारी रोजी मंगळवारला पत्रकार दिनाचे औचित्य साधुन स्पर्धा परिक्षा मार्गदर्शन शिबिर व वादविवाद स्पर्धेचे आयोजन स्वागत मंगल कार्यालय येथे केले आहे.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष पवन जयस्वाल हे राहणार आहे. उद्घाटक म्हणून जिल्हाधिकारी राहूल रंजन महिवाल हे राहणार आहे. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून लोकमतचे कार्यालय प्रमुख किशोर दर्डा, राष्टÑीय मराठी पत्रकार संघाचे विदर्भाध्यक्ष तथा परिवर्तन समाचारचे आवृत्ती संपादक संदीप खडेकर, नेहरू शिक्षण संस्थेच अध्यक्ष परमानंद अग्रवाल उपस्थित राहणार आहे. कार्यक्रमाला मार्गदर्शन महणून प्रा. संजय नाथे, अचलपूरचे उपविभागीय अधिकारी श्यामकांत म्हस्के, उपविभागीय पोलीस अधिकारी कल्पना मराडे, उपजिल्हाधिकारी संदीप कुमार अपार, उपविभागीय पोलीस अधिकारी विजय लगारे, ठाणेदार गणेश भावसार, पत्रकार संघाचे अध्यक्ष गजानन काळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनिता पवार, पोलिस उपनिरीक्षक डॉ. रंगनाथ जगताप इत्यादी मान्यवर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहे.
कार्यक्रमाचे दुसºया सत्रात वादविवाद स्पर्धेचे आयोजन केले आहे. ‘वाढत्या भ्रष्टाचाराला जनता तारक की मारक’ हा वादविवाद स्पर्धेचा विषय आहे. स्पर्धेतील विजयी स्पर्धकाला प्रथम बक्षीस ३,००१ रुपये, द्वितीय बक्षीस २,००१ रुपये तर तृतीय बक्षीस १,००१ रुपये ठेवण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संदीप खडेकर तर उद्घाटक म्हणून दैनिक हिंदुस्थानचे आवृत्ती संपादक नागेश गोरख हे उपस्थित राहणार आहे. प्रमुख अतिथी म्हणून राजेंद्र माहूरे, श्रमीक पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष नितीन पखाले, झी २४ तासचे जिल्हा प्रतिनिधी श्रीकांत राऊत, गटविकास अधिकारी गौतम भगत, दै. पुण्य नगरीचे उपसंपादक तथा महाराष्टÑ न्युज नेटवर्कचे संपादक राहुल वासनिक, भाजपाचे तालुकाध्यक्ष पुरूषोत्तम लाहोटी, नगरसेवक भाऊराव ढवळे, पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष गजानन काळे, अविनाश बन्सोड, मिना सावळकर, जेष्ठ पत्रकार नारायण वंजारी, दै. दिव्य मराठीचे जिल्हा प्रतिनिधी नितीन भागवत, नगरसेवक संजय दारव्हटकर, अंधश्रध्दा निर्मुलन समितीचे बंडू बोरकर, नगर परिषदचे बांधकाम सभापती शालीक गुल्हाणे, नगरसेविका अ‍ॅड. रश्मी पेटकर, भाजपाचे जिल्हा सचिव राजेंद्र देऊळकर, वैष्णवी गुल्हाणे, पंचायत समिती सभापती भरत मसराम, वसंत महल्ले, प्रा. शांतरक्षीत गावंडे इत्यादी उपस्थित राहणार आहे. या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन पत्रकार संघाचे अध्यक्ष गजानन काळे, कार्याध्यक्ष अरूण राऊत, सचिव किशोर वंजारी, उपाध्यक्ष अशोक इसाळकर, कोषाध्यक्ष संजय राऊत, संघटक प्रवीण पाटमासे, संघटक विनोद कापसे, मार्गदर्शक प्रा. सदाशिव जरोटे, पांडूरंग भोयर, रमेश दिक्षीत, नदिम खान, निलेश वंजारी, वसीम शेख, बिस्मिला पठाण, अमीन पठाण, राहुल सोहर यानी केले आहे.

January 03, 2015 in महाराष्ट्र
१ रुपयांच्या नोटेची पुन्हा छपाई सुरू 0

१ रुपयांच्या नोटेची पुन्हा छपाई सुरू

one-rupee
औरंगाबाद – चलनातून गायब झालेल्या एक रुपयांच्या नोटा अवघ्या दोन महिन्यांत शहरातील बाजारपेठेत दिसतील. १ जानेवारीपासून या नोटांची छपाई केंद्र सरकारच्या वतीने सुरू करण्यात आली.
१, २ आणि ५ रुपयांची नाणी चलनात आल्यानंतर सुमारे २० वर्षांपूर्वी या रुपयांच्या नोटांवर बंदी आणली. एक रुपयांच्या नोटांची छपाई नोव्हेंबर १९९४ मध्ये, दोन रुपयांच्या नोटा फेब्रुवारी १९९५ मध्ये, तर पाच रुपयांच्या नोटांची छपाई नोव्हेंबर १९९५ मध्ये बंद करण्यात आली. दरम्यान, ५ रुपयांच्या नोटांची छपाई सरकारने पुन्हा सुरू ठेवली होती. आता केंद्र सरकारने पुन्हा एक रुपयांच्या नोटांची छपाई करण्याचा निर्णय घेतला असून, अर्थ मंत्रालयाने याबाबतची अधिसूचना नुकतीच प्रसिद्ध केली आहे.औरंगाबादमध्ये एक रुपयांची नोट यायला निदान २ महिने तरी लागतील. औरंगाबादमध्ये या नोटा आरबीआयकडून एसबीआय, महाराष्ट्र बँक आणि एसबीएचच्या मुख्य कार्यालयाच्या मागणीनुसार याच बँकांना दिल्या जातील. छपाईनंतर आधी मुंबई-पुण्यात आल्यानंतर त्या व्यवहारात येण्यास सुरुवात होईल.

January 03, 2015 in मुख्य पान
३५० विद्यार्थ्यांना विषबाधा 0

३५० विद्यार्थ्यांना विषबाधा

21142523
सोलापूर – जिल्ह्यातील करमाळा तालुक्यात कोर्टी येथील श्री छत्रपती शिवाजी हायस्कूलमध्ये सुमारे ३५० विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याचे वृत्त आहे. या विद्यार्थ्यांपैकी २० ते २२ मुलांची प्रकृती खालावल्याने त्यांना उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान, या सगळ्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याची माहिती मिळते आहे.
श्री छत्रपती शिवाजी हायस्कूलमध्ये आज सकाळी साडे नऊच्या सुमारास विद्यार्थ्यांना मध्यान्न भोजन योजने अंतर्गत पुरण्यात येणारी खिचडी देण्यात आली. त्यानंतर अनेकांना मळमळ, तसेच अस्वस्थ वाटू लागले. त्यानंतर एकापाठोपाठ एक असे सगळेच विद्यार्थी पोट दु:खी आणि मळमळ झाल्याची तक्रार करू लागले. या विद्यार्थ्यांना प्रथम स्थानिक रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. ज्या २० ते २० मुलांची प्रकृती खालावली त्यांना तत्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथील उपचारानंतर मुलांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याची माहिती देण्यात आली आहे. या सर्व प्रकाराची चौकशी सुरू असून अन्न पदार्थांचे नमूने प्रशासनाकडून गोळा करण्यात आले आहेत. तपाणी अहवाल आल्यानंतर दोषींवर कारवाई करण्यात येणार असल्याचे कळते.

January 03, 2015 in मुख्य पान
डॉ. गोवारीकर यांचे निधन 0

डॉ. गोवारीकर यांचे निधन

DR
पुणे- अवकाश संशोधन, हवामान आणि लोकसंख्या या तीन क्षेत्रात संशोधन करणारे ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. वसंत गोवारीकर (८१) यांचे पुण्याच्या दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये निधन झाले. मूलभूत समस्यांची जाण असणारा संशोधक अशी डॉ. गोवारीकर यांची ख्याती होती. पॉलिमर केमिस्ट्रीत त्यांनी केलेले संशोधन जगभर गाजले. डॉ. विक्रम साराभाई यांच्यासोबत भारतीय अवकाश तंत्रज्ञानाच्या प्रगतीतही त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती.
डॉ. गोवारीकर यांच्या नेतृत्वाखाली १९८३ मध्ये एसएलव्ही तीन यान ही मोहीम यशस्वी झाली होती. पंतप्रधानांचे विशेष सल्लागार म्हणून १९९१ ते १९९३ या काळात त्यांनी काम केले होते. त्यांनी १९९४ ते २००० दरम्यान मराठी विज्ञान परिषदेचे अध्यक्षपद भूषवले होते. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे ते माजी कुलगुरू होते.
अनेक पुस्तके आणि शेकडो विज्ञान निबंध त्यांच्या नावावर आहेत. ‘आय प्रेडिक्ट’ हे भारतीय लोकसंख्येवरील भाष्य करणारं त्यांचं पुस्तक प्रसिद्ध आहे. पद्मश्री, फाय फाऊंडेशन पारितोषिक, नायक सुवर्णपदक, अनेक विद्यापीठांच्या डॉक्टरेट्स अशा अनेक पुरस्कारांनी त्यांना गौरवण्यात आलं होतं.

January 02, 2015 in महाराष्ट्र
पाकिस्तानी बोटीचा स्फोट- दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला 0

पाकिस्तानी बोटीचा स्फोट- दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला

Fishing boat intercepted by coast guard
नवी दिल्ली- भारताच्या सागरी हद्दीत घुसखोरी करत असताना तटरक्षक दलाच्या जवानांनी अडवलेल्या पाकिस्तानी बोटीतील चार जणांनी गुजरातमधील पोरबंदरजवळ स्वतःला उडवून घेत स्फोट घडवून आणला. नौदलाच्या सतर्कतेमुळे दहशतवादी हल्ल्याचा कट उधळल्याचे धक्कादायक वृत्त आहे. विशेष म्हणजे मुंबईवरील २६/११ च्या हल्ल्याला सहा वर्ष पूर्ण झाल्यानंतर महिन्याभरातच ही बातमी समोर आली आहे.
गुजरातच्या समुद्र हद्दीत एका संशयित पाकिस्तानी जहाजातून मोठ्या प्रमाणावर विस्फोटके वाहून नेत असल्याची माहिती नौदलाला मिळाली होती. ३१ डिसेंबरला याबाबतची माहिती गुप्तचर यंत्रणेने दिली होती. त्यानुसार एक जानेवारीला पहाटे या पाकिस्तानी मच्छिमारी बोटीच्या संशयित हालचाली लक्षात आल्यानंतर भारतीय नौदलाने चौकशीसाठी या बोटीला अडवण्याचा प्रयत्न केला. मात्र जहाजाने आपला वेग वाढवत पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र नौदलाने पोरबंदरपासून ३६५ किलोमीटर अंतरावर असताना या बोटीला चारही बाजूंनी घेरले. आपण घेरलो गेल्याचे निदर्शनास येताच बोटीवर असलेल्यांनी स्वतःला उडवून घेत स्फोट घडवून आणला. त्यात चार जण मृत्यूमुखी पडल्याचे वृत्त आहे.
Fishing boat intercepted by coast guardडोर्नियर एयरक्राफ्टच्या मदतीने हे ऑपरेशन करण्यात आले. डोर्निअर विमानाने शोध घेत दिवे न लावता लपत लपत जाणारी ती संशयित बोट शोधून काढली. त्यानंतर तटरक्षक दलाच्या गस्त घालणा-या नौकेला वर्दी देण्यात आली. कराची येथील केती बंदरातील ही मच्छिमार बोट होती. संशयित हालचाली लक्षात येताच त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला असता ते पळू लागल्याने संशय आणखी बळावला, असे नौदल्या अधिका-यांनी शुक्रवारी बोलताना सांगितले.

January 02, 2015 in मुख्य पान
‘रेझींग डे’: विद्यार्थ्यांनी जाणून घेतली शस्त्राची माहिती 0

‘रेझींग डे’: विद्यार्थ्यांनी जाणून घेतली शस्त्राची माहिती

666

यवतमाळ – जिल्हा पोलीस दलाच्या वतीने रेझींग डे निमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी शस्त्राची माहिती जाणून घेतली. त्यानंतर निघालेल्या रॅलीने यवतमाळकरांचे लक्ष वेधून घेतले.
पोलीस अधीक्षक संजय दराडे यांच्या हस्ते रेझींग डे सप्ताहाचे आज सकाळी उद्घाटन करण्यता आले. या कार्यक्रमात शिवाजी विद्यालय, विवेकानंद विद्यालय, अभ्यंकर महिला विद्यालय, लोकनायक बापूजी अणे आदी विद्यालयातील विद्यार्थी, विद्यार्थीनी, शिक्षक, शिक्षिका मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी पोलीस अधीक्षक संजय दराडे यांनी पोलीस दलात वापरण्यात येणाºया शस्त्राबाबत माहिती दिली. महिलांवर होणारे अत्याचार, कौटुंबिक व्यभिचारासह हेल्पलाईन क्रमांक १०९१ बाबत मार्गदर्शन करून महाविद्यालयात तक्रार पेटी सुरू करण्याबाबत प्राचार्यांना सूचना करण्यात आल्या. पोलीस अधीक्षकांच्या हस्ते रॅलीला हिरवी झेंडी दाखवून सुरुवात करण्यात आली. यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक जे.बी. डाखोरे, उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजय पुजलवार, जिल्हा वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक वांदीले वडगाव, शहर पोलीस ठाण्याचे ठाणेदार यांच्यासह पोलीस मुख्यालयातील पोलीस कर्मचारी उपस्थित होते.

January 02, 2015 in विदर्भ