
हैदराबाद- कुकटपल्ली येथील गल्फ ऑइल कॉर्पोरेशनच्या आवारात सोमवारी सायंकाळी झालेल्या एका स्फोटात दोन कामगार मृत्युमुखी पडले असून अन्य १३ जण भाजल्याने जखमी झाले.
जखमींना जवळच्या रुग्णालयामध्ये हलविण्यात आले आहे. स्फोटानंतर भडकलेली आग आटोक्यात आल्याचे मधापूर क्षेत्राचे पोलीस उपायुक्त कार्तिकेय यांनी सांगितले.येथे डिटोनेटर्स निष्कासित करत असताना अचानक स्फोट झाल्याचे अतिरिक्त पोलीस उपायुक्त एम. श्रीनिवास राव यांनी सांगितले.
Archive for February, 2015
0
हैदराबादमध्ये स्फोटात दोन ठार, १३ जखमी
0
फौजदारी, कर खटल्यांसाठी स्वतंत्र न्यायालये

नवी दिल्ली – फौजदारी आणि कर निवाडय़ासंदर्भातील खटले तातडीने निकाली काढण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने सोमवारपासून दोन स्वतंत्र न्यायालये सुरू केली आहेत. प्रलंबित खटले निकाली काढण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे.
सर्वोच्च न्यायालयाचे रजिस्ट्रार एम. के. हंजुरा म्हणाले की, जुने फौजदारी खटले आणि करविषयक याचिका निकाली काढण्यासाठी सरन्यायाधीशांनी ही न्यायालये सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
सध्या सर्वोच्च न्यायालयात ११,१३७ फौजदारी आणि १०८४३ करविषयक खटले प्रलंबित आहेत. या न्यायालयासाठी दिल्ली उच्च न्यायालयाने आवश्यक त्या पायाभूत सुविधा पुरवल्या आहेत. तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या आवारात मोफत ‘वाय-फाय’ सुविधा पुरवल्या जाणार आहेत.
0
ठाण्यात शिवसेना-भाजप युती कायम

मुंबई-(महाराष्ट्र् न्यूज नेटवर्क-सतिष राठोड)
राज्यात गेल्या काही दिवसांपासून भाजप-शिवशेनेच्या नेत्यांनी एकमेकांवर अारोप लावण्याचे काही कमी केले नाही.हे सर्वांना माहितच अाहे,पण अाता शिवसेना-भाजप हे दोन्हीही पक्ष अागामी महापालिका निवडणणुकांच्या पार्श्वभूमीभूमीवर ठाण्यात शिवसेना-भाजप एकत्र राहणार अाहे,तसेच शिवसेना – भाजपमधील वाढत्या तणावाचा विचार लक्षात घेऊन आज शिवसेना नेत्यांची मुख्यमंत्र्यांसोबत त्यांच्या निवासस्थानी ‘वर्षा’ बंगल्यावर बैठक झाली. ्या बैठकित शिवसेनेचे विधीमंडळ गट नेते एकनाथ शिंदे, आमदार प्रताप सरनाईक सोबत अादी नेते उपस्थित होते.तसेच मीरा-भाईंदर महापालिकेत महापौर पदासाठी भाजपच्या गीता जैन, तर उपमहापौर पदासाठी शिवसेनेचे प्रविण पाटील उमेदवारी अर्ज भरण्याबाबतही शिक्का मोर्तब करण्यात अाला.
0
राष्ट्रपतींच्या अभिभाषणाने अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु

नवी दिल्ली – राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या अभिभाषणाने संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सोमवारपासून सुरुवात झाली. ‘सबका साथ, सबका विकास’ या तत्वाने सरकार काम करणार असल्याचे राष्ट्रपतींनी सांगितले.
मागच्या नऊ महिन्यात सरकारने जी पाऊले उचलली, निर्णय घेतले त्याची माहिती राष्ट्रपतींनी आपल्या अभिभाषणात दिली. मागच्या नऊ महिन्यात केंद्र सरकारने अर्थव्यवस्थेला गती देणारे निर्णय घेतले असून, गरीबांसाठी कल्याणकारी योजना राबवल्या आहेत.
ग्रामीण भारताचा दीर्घकालीन सामाजिक-आर्थिक विकास केंद्र सरकारसाठी महत्वाचा असल्याचे त्यांनी सांगितले. स्वच्छ भारत अभियानही सरकारचे महत्वाचे उद्दिष्टय़ असून, २०१९ पर्यंत हे अभियान यशस्वी करण्याचे लक्ष्य आहे. खासदारांनी आपला ५० टक्के खासदारनिधी स्वच्छ भारत अभियानावर खर्च करावा असे राष्ट्रपतींनी आवाहन केले.
या अधिवेशनात महत्वाची विधेयके मंजूर करण्याचे सरकारचे लक्ष्य असून, जमिन अधिग्रहण विधेयकावरुन सरकार आणि विरोधकांमध्ये संघर्ष होण्याची शक्यता आहे.
विरोधकांनी अडवून धरलेल्या विधेयकांची वाट निर्विघ्न व्हावी यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समन्वयाची भाषा केली. ‘अर्थसंकल्पीय अधिवेशनाकडून देशभरातील जनतेला मोठय़ा अपेक्षा असतात. हे अधिवेशन सुरळीत पार पडावे ही सर्व पक्षांची सामूहिक जबाबदारी असते, असे सांगत मोदी यांनी सर्वच पक्षांकडून सहकार्य मिळेल अशी आशा व्यक्त करत रविवारी आयोजित सर्वपक्षीय बैठकीत नरमाईची भूमिका घेतली.
0
भूसंपादन कायद्याविरोधात अण्णांचे दिल्लीत आंदोलन

नवी दिल्ली – भूसंपादन कायद्यात करण्यात आलेल्या बदलांविरोधात ज्येष्ठ सामाजसेवक अण्णा हजार सोमवारपासून दिल्लीत आंदोलन करणार आहेत. त्याआधी ‘बीबीसी’ला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी आपल्या या आंदोलनात माओवाद्यांशी संपर्क केला जाईल असे म्हटले आहे. माओवाद्यांच्या सहकार्याबाबत आंदोलनातील सहकारी मेधा पाटकर आणि अरुणा राय यांच्याशी चर्चा करणार असल्याचेही अण्णा म्हणाले. जर सर्वांनी सहमती दर्शवली तर चर्चा होऊ शकते, असे त्यांनी सांगितले.
बीबीसी हिंदीला दिलेल्या मुलाखतीवेळी अण्णांना विचारण्यात आले, की माओवाद्यांचा दावा आहे की ते आदिवासींच्या जमीनींसाठी संघर्ष करत आहेत. तर, तुम्ही त्यांच्याशी संपर्क करु शकता का? यावर अण्णा हजारे म्हणाले, ‘अद्याप केलेला नाही. मात्र पुढे करु.’ अण्णा म्हणाले,की आतापर्यंत हा प्रश्न फक्त आदिवासींपूरता मर्यादित होता. आता सगळ्या देशातील शेतकर्यांचा झाला आहे. त्यांच्या भविष्याशी निगडीत हा प्रश्न आहे. जेव्हा अण्णांना विचारण्यात आले, की माओवादी, समाजवादी आणि इतरही अनेक छोट्या मोठ्या संघटना शेतकर्यांच्या हितासाठी लढा उभारत असल्याचा दावा करत आहेत, तर ते म्हणाले, की आंदोलन सुरु होईन काही दिवसच झाले आहेत. सर्वांशी संपर्क करायला जरा वेळ लागेल. सर्वांनी एका मंचावर आले पाहिजे. सर्वांनी एकत्र येऊन शेतकर्यांसाठी लढा दिला पाहिजे. शेतकर्यांची जमीन ज्या पद्धतीने हडपली जात आहे त्याविरोधात देशव्यापी आंदोलनाची गरज आहे.
0
गोपीनाथ मुंडेंचे स्मारक होणार

औरंगाबाद – ‘माजी केंद्रीयमंत्री कै. गोपीनाथ मुंडे यांच्या सामाजिक, राजकीय कार्यकर्तृत्वाची ओळख जपणारे सुसज्ज असे स्मारक येथील जालना रोडवरील शासकीय दूध डेअरी जमिनीवर लवकरच उभारले जाईल,’ अशी घोषणा महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी पत्रकार परिषदेत केली.
सुभेदारी शासकीय विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत श्री. खडसे बोलत होते. ‘मराठवाड्याच्या विकासासाठी कायम अग्रणी भूमिका घेणारे मराठवाड्याचे सुपूत्र गोपीनाथ मुंडे यांची सामान्य माणसाबद्दलची निष्ठा आणि विकास कामाबद्दलचा आग्रह या भूमिकेतून त्यांनी केलेली राजकीय वाटचाल ही प्रेरक आहे. त्यांच्या वाटचालीतील महत्त्वपूर्ण प्रसंगांची माहिती करून देणारे दृकश्राव्य चित्रण, त्यांची निवडक भाषणे, त्यांच्या जीवनाबद्दल माहिती देणाऱ्या वस्तूंचे संग्रहालय त्यासोबत ग्रंथालय आणि सुंदर बाग अशा सुविधांनी युक्त उत्कृष्ट असे स्मारक येत्या वर्षभरात उभे करण्याचा शासनाचा विचार आहे,’ असे खडसे म्हणाले.
‘लवकरच मंत्रीमंडळाची मान्यता घेऊन स्थानिक आमदार, तज्ज्ञ व्यक्ती, समाजसेवक यांचा समावेश असणारी जिल्हाधिकारी नियंत्रित स्मारक समिती गठीत केली जाईल. या समितीच्या माध्यमातून स्मारक उभारणीचे काम लवकरच पूर्ण करण्यात येईल,’ असेही खडसे यांनी सांगितले .
0
ऑस्करमध्ये ‘बर्डमॅन’ ठरला सर्वोत्कृष्ट चित्रपट

लॉस एन्जल्स – लॉस एन्जल्समध्ये रंगलेल्या ८७ व्या ऑस्कर पुरस्कार सोहळयात ‘बर्डमॅन’ने यंदाचा सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा ऑस्कर पुरस्कार मिळवला.
अलेजांद्रो गोन्झालेझ इनारीतू दिग्दर्शित ‘बर्डमॅन’ आणि वेस अँडरसन दिग्दर्शित ‘द ग्रँड बुडापेस्ट हॉटेल’ या चित्रपटांना सर्वोत्तम चित्रपटासह एकूण नऊ विभागांत नामांकने मिळाली होती.
बर्डमॅनसाठी अलेजांद्रो गोन्झालेझ इनारीतूला सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनाचाही पुरस्कार मिळाला. द थिअरी ऑफ एव्हरीथिंगसाठी एडी रेडमनला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा तर, स्टील अॅलिससाठी ज्यूलिअन मूरला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला.
हॉलिवुडमधील प्रतिष्ठेच्या समजल्या जाणा-या या पुरस्कार सोहळयाला हॉलिवुडमधील आघाडीचे कलाकार उपस्थित होते.
द ग्रॅड बुडापेस्ट हॉटेल आणि व्हीपलॅश या सिनेमाने प्रत्येकी तीन पुरस्कार मिळवले आहेत. ऑस्करच्या परदेशी भाषा चित्रपट विभागामध्ये पुरस्कारासाठी भारताकडून ‘लायर्स डाइस’ या हिंदी चित्रपटाची निवड झाली होती. मात्र हा चित्रपट पुरस्काराच्या शर्यतीतून बाद झाला.
हरवलेल्या पतीच्या शोध घेण्यासाठी निघालेल्या एका आदिवासी महिलेच्या प्रवासाची गोष्ट या चित्रपटात दाखवली होती. ‘इडा’ या पोलंडच्या चित्रपटाने भाषा विभागात सर्वोत्कृष्ट परदेशी चित्रपटाचा ऑस्कर पुरस्कार मिळवला.
ऑस्कर विजेते –
सर्वोत्कृष्ट चित्रपट – बर्डमॅन
सर्वोत्कृष्ट अभिनेता – एडी रेडमन (द थिअरी ऑफ एव्हरीथिंग)
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री – ज्यूलिअन मूर (स्टील अॅलिस)
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक – अलेजांद्रो गोन्झालेझ इनारीतू (बर्डमॅन)
सर्वोत्कृष्ट सिनेमॅटोग्राफी – बर्डमॅन
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री – पॅट्रिशिया ऍराक्वेट (बॉयहूड)
सर्वोत्कृष्ट लाईव्ह ऍक्शन शॉर्ट फिल्म – बॅग बाय द फोन कॉल
सर्वोत्कृष्ट साउंड एडिटिंग – ऍलन रॉबर्ट मुरे आणि बुब अस्मान (अमेरिकन स्नायपर)
सर्वोत्कृष्ट साउंड मिक्सिंग – क्रेग मन, बेन विलकिन्स, आणि थॉमस कर्ले (व्हिपलॅश)
सर्वोत्कृष्ट डॉक्युमेंटरी शॉर्ट फिल्म – क्राईसिस हॉटलाईन
सर्वोत्कृष्ट प्रॉडक्शन डिझाईन – ऍडम स्टॉकहाऊसेन व ऍना पिनॉक (द ग्रँड बुडापेस्ट हॉटेल)
सर्वोत्कृष्ट स्पेशल इफेक्ट्स – इंटर्सटेलर
ऍनिमेटेड शॉर्ट फिल्म – पॅट्रीक ऑसब्रोन व क्रिस्टिना रिड (फिस्ट)
सर्वोत्कृष्ट ऍनिमेटेड फिचर फिल्म – डॉन हॅल, ख्रिस विल्यम्स व रॉय कोनली (बिग हिरो ६)
परदेशी भाषांतील सर्वोत्कृष्ट चित्रपट – इडा (पोलंड)
सर्वोत्कृष्ट वेशभूषा – मिलेना कॅनोनेरो (द ग्रँड बुडापेस्ट हॉटेल)
0
२५ फेब्रुवारी पासून बैंक ४ दिवस बंदचा इशारा
मुंबई – देशभरातील एकूण २८ सरकारी बैंक कर्मचार्यांची संख्या ८ लाख असुन,कर्मचार्यांच्या पगार वाढीचा मुद्दा गेल्या नोव्हेंबर २०१२ पासून प्रलंबित अाहे,पगार वाढीचा मुद्दा लवकरात लवकर मर्गी लावण्याचा इशारा दिला अाहे,व ४ दिवस बैंक बंद असतील, तसेच बैंक बंद इशारा बद्दल अाज सोमवारी महत्वाची बैठक बैंक कर्मचार्यांनी व इंडियन बैंक असोसिएशन,यूनायटेड फोरम अाॅफ बैंक यूनियंस (महाराष्ट्र) अाणि अाॅल इंडिया बैंक एम्प्लाइजचे अध्यक्ष विश्वास उत्गी यांची बैठक अायोजित केली अाहे.
इंडियन बैंक असोसिएशन अाणि बैंकचे कर्मचारी संघ यांनी या बैंक बंदच्या विषय टाळण्यासाठी विचार करत अाहेत.तसेच या बैठकीत तसे झाले नाही तर दि.२५ पासून ४ दिवस बैंक बंद राहणार अशी माहिती असोसिएशनने दिली अाहे.हा बैंक बंदचा इशारा बैठकिमध्ये मान्य करण्यात अाला तर,वित्तीय वर्षातील हा ५ वा बैंक बंदचा इशारा ठरेल.
राज्य सरकार शिवस्मारकाला झेड प्लस सुरक्षा देणार
![]()
मुंबई-(महाराष्ट्र न्यूज नेटवर्क,सतिष राठोड)- राज्य सरकारने अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक बांधण्याचे निर्णय घेतले असुन,केंद्र सरकारने या स्मारकाला मंजुरी दिली अाहे.नरीमन पाॅईंट येथून समुद्रात सुमारे २.५ कि.मी अंतरावर शिवरायांचे भव्य स्मारक बांधण्यात येणार अाहे,२०१९ मध्ये या स्मारकाचे काम पूर्ण होईल असा अंदाज अाहे.व हे स्मारक मुंबईच्या पर्यटन दृष्टीकोनातून प्रमुख अाकर्षण ठरणार असुन,स्मारक तयार झाल्यावर दररोज सुमारे १०,००० पर्यटक स्मारकाला भेट देतील.या स्मारकाला अभैद्य सुरक्षा कवच देण्याचा सरकारचा प्रयत्न असेल.
२६/११ च्या हल्ल्यात दहशतवादी समुद्र मार्गाने भारतात अाले होते,या पार्श्वभूमीवर शिव स्मारकात कोणतीही उणीव राहू नये म्हणून सरकारचे याकडे लक्ष राहील.स्मारकात सीसी टीव्ही कॅमेरा तसेच सुरक्षा दलांना दहशतवाद्यांना कडेकोट उत्तर देता यावे,यासाठी बंकरेही असतील.एनएसजी ची तुकडीही शिव स्मारकाच्या रक्षणासाठी तैनात असेल.तटरक्षक दल,मुंबई पोलीसही या स्मारकाच्या रक्षणासाठी सज्ज असतील.सर्वात महत्वाचे म्हणजे स्मारकात अॅंटी रडार सिस्टम असेल,यामुळे कोणत्याही रडारवर स्मारक दिसू शकणार नाही.हे स्मारक १६ हेक्टरच्या जागेत बांधण्यात येणार असुन स्मारकाची उंची १९० फूट व स्मारक बांधण्यासाठी १९०० कोटी रुपये खर्च अपेक्षित अाहे.त्यामुळे हा स्मारक सर्वदृष्ट्या प्रेक्षणिय असणार अाहे.
0
नितीश कुमार बनले चौथ्यांदा मुख्यमंत्री

पाटणा : बिहारच्या राजकारणातील चाणक्य मानले जाणारे नितीश कुमार यांनी रविवारी चौथ्यांदा बिहारच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. जितनराम मांझी यांनी जबर आव्हान उभे केल्यानंतर गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या राजकीय नाट्यावर पडदा टाकत नितीश कुमार यांना नऊ महिन्यांनंतर पुन्हा पदारूढ होण्यात यश आले.
राजभवनात राज्यपाल केसरीनाथ त्रिपाठी यांनी ६३वर्षीय नितीश कुमार आणि २२ मंत्र्यांना पद व गोपनीयतेची शपथ दिली. त्यात तीन महिला आमदारांना स्थान मिळाले आहे. मांझी यांच्या सरकारमधून राजीनामा देणाऱ्या २० मंत्र्यांना पुन्हा स्थान मिळाले असून, उर्वरित २ मंत्र्यांची मांझी यांनी हकालपट्टी केली होती. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नितीश कुमार यांचे टिष्ट्वटरद्वारे अभिनंदन केले.
0
बिबट्याचा गायीवर हल्ला

झरी (यवतमाळ ), दि. २२ – तालुक्यातील मार्की(बु.) येथील उत्तम शिवराम पडघन यांच्या शेतात चौथ्यांदा बिबट्याने हल्ला चढविल्याची घटना आज रविवारी सकाळी घडली. आज सकाळी सदर शेतकरी शेतात गेला असता वासराला वाचविण्यासाठी गाय बिबट्यासोबत संघर्ष करीत असल्याचे दिसून आले. हे दृश्य बघून घाबरलेला शेतकरी एका झाडावर लपून बसला. बराच वेळ गाय व बिबट्यात संघर्ष चालला. त्यानंतर बिबट्या जंगलाच्या दिशेने निघून गेला. ही बाब उत्तम पडघन याने गावात येवून ग्रामस्थांना सांगितली. नागरिकांनी घटनास्थळ गाठून पाहणी केली. पायघन यांच्या शेतात बिबट्याने चौथ्यांदा हल्ला चढविला आहे. वनविभागाने परिसरात केवळ एक पिंजरा लावला. मात्र बिबट्याला जेरबंद करण्यासाठी कोणतीही उपाययोजना करण्यात आली नाही. त्यामुळे शेतकºयांकडून रोष व्यक्त होत आहे.
0
शाळेत विद्यार्थीनी जळाली, कळंब येथील घटना

यवतमाळ, दि. २२ – कळंब येथील जिल्हा परिषद वरीष्ठ प्राथमिक कन्या शाळेतील इयत्ता सातवी मध्ये शिकत असलेली विद्यार्थीनी जळाल्याची घटना शुक्रवारी घडली.
वैष्णवी काळे असे विद्यार्थीनीचे नाव असून ती कळंब येथील जिल्हा परिषद वरीष्ठ प्राथमिक कन्या शाळेत ती सातव्या वर्गात शिक्षण घेत आहे. २० फेबु्रवारी रोजी ती भाजीची बकेट उचलून नेत असताना, ती खाली पडली. त्यावेळी अंगावर गरम भाजी सांडल्याने ती जळाली. विद्यार्थीनीची ओरड ऐकून शिक्षकांनी तेथे धाव घेऊन तिला रुग्णालयात भरती केले असून तीची प्रकृती चांगली आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी होऊन दोषी विरुद्घ कारवाई करण्यात यावी, अशी मागणी पालक वर्गातून होत आहे.
0
महिलेवर सामुहीक अत्याचार

यवतमाळ , दि. २२ – देवदर्शनासाठी सोबत आलेल्या परभणीच्या महिलेवर अत्याचार केल्याची घटना महागाव तालुक्यातील कोंडरी परीसरातील महादेव मंदीर देवस्थानात घडली. सुनील उर्फ जगदीश बाबा, अरविंद जीप चालक, शिवाजी उजवणकर व कौशल्या उजवणकर अशी आरोपींची नावे आहे.
महागावनजीक असलेल्या कोंडरी येथील महादेव मंदीर देवस्थान प्रसिद्घ आहे. गेल्या वर्षभरापासून वरील आरोपी येथे दर्शनासाठी येत होते. यांच्यासोबत पिडीत महिला देखील येत होती. १९ फेब्रुवारीला ते जीप घेऊन आले होते. यातील सुनील उर्फ जगदीश बाबा यांने अरविंद जीप चालक, शिवाजी उजवणकर व कौशल्या उजवणकर यांच्याशी संगणमत करून पिडीत महिलेवर अत्याचार केला. त्यानंतर महिलेला तिथेच सोडून घटनास्थळावरून पसार झाले.याबाबत महिलेने महागाव पोलीस स्टेशनला तक्रार नोंदविली असून, याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंद करून फरार आरोपींचा शोध सुरू केला आहे.
0
ठाणे येथे २८ फेब्रुवारीला पासपोर्ट मेळावा

ठाणे – येथे २००१ मध्ये सुरु करण्यात अालेल्या या कार्यालयातून ठाणे,पालघर,रायगड,नवी मुंबई,जळगाव या विभागात राहणार्या लोकांसाठी एका दिवसाला १,००० पासपोर्ट देण्यात येतो.तसेच ठाणे पासपोर्ट अधिकारी एम.डी शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार,नवी मुंबई अाणि रायगडच्या पासपोर्ट बनविणार्यांची संख्या लक्षात घेऊन, शनिवार दि.२८ फेब्रुवारी या दिवशी विशेष पासपोर्ट मेळावा अायोजित करण्यात अालेला अाहे.मेळाव्यात तात्काळ व साधारण या दोन्हीही योजना राबविण्यात येणार असुन,अपाइमेंट न घेतलेल्यांनीही या मेळाव्यात ओरिजिनल कागदपत्रे घेऊन सहभाग घ्यावा.तसेच त्यांची पडताळणी करुन त्यांना लवकरात लवकर पासपोर्ट देण्यात येणार असुन,या मेळाव्याचे अायोजन दि.२८ फेब्रुवारी या दिवशी वागळे इस्टेट येथिल पासपोर्ट कार्यालयात करण्यात येणार अाहे.
0
भारताने द.आफ्रिकेविरुद्ध १३० धावांनी मिळवला विजय
मेलबर्न – इतिहास हे नेहमी बदलण्यासाठीच असतात हे भारताने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या आजच्या सामन्यातून दाखवून दिले. विश्वचषकात पाकिस्तानविरुद्ध विजयाची परंपरा कायम ठेवणा-या भारताने दक्षिण आफ्रिकेविरुद्धची पराभवाची मालिका अखेर खंडित केली. आजवर विश्वचषकात दक्षिण आफ्रिकेविरुद्घ भारत एकही सामना जिंकलेला नाही. मात्र या सामन्यात फलंदाजी आणि गोलंदाजी या दोन्ही आघाड्यांवर चमकदार कामगिरी करत भारताने द.आफ्रिकेविरुद्ध १३० धावांनी विजय मिळवला. तर विश्वचषकात सलग दुसरा विजय नोंदवला.
भारताने प्रथम फलंदाजी करत ५० षटकात सात बाद ३०७ धावा केल्या. भारताच्या गोलंदाजीसमोर आफ्रिकेचा संघ ४०.२ षटकात १७७ धावांवर संपुष्टात आला. शिखर धवनची शतकी आणि अजिंक्य रहाणेचे ७९ धावांची तडाखेबाज खेळी भारताच्या विजयात महत्त्वाची ठरली. गेल्या अनेक दिवसांपासून फॉर्मात नसलेल्या शिखर धवनला या सामन्यात सूर गवसला आणि त्याने दमदार १३७ धावांची खेळी साकारली. १४६ चेंडूत त्याने १६ चौकार आणि दोन षटकारांची बरसात करत १३७ धावा केल्या.शिखरचे एकदिवसीय कारकिर्दीतील हे सातवे शतक आहे. त्याला उत्तम साथ दिली ती अजिंक्य रहाणेने. त्याने ६० धावांत ७९ धावा केल्या. यामध्ये सात चौकार आणि तीन षटकारांचा समावेश आहे. या दोघांनी द.आफ्रिकेच्या गोलंदाजांची यथेच्छ धुलाई केली.
प्रत्युत्तरादाखल मैदानात आलेल्या दक्षिण आफ्रिकेला दुस-याच षटकात मोहम्मद शामीने पहिला धक्का दिला. सलामीचा फलंदाज क्विंटन डी कॉकला अवघ्या सात धावांवर विराटकडे झेल देऊन बाद केले. दक्षिण आफ्रिका एक बाद १२ धावा अशी स्थिती असताना मैदानात उतरलेल्या हाशिम आमला याला मोहित शर्माने बाद केले. त्याने २२ धावा केल्या. त्यानंतर कर्णधार एबी डिविलिअर्स आणि फाफ ड्यु प्लेसिसने दक्षिण आफ्रिकेचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र, मोहित शर्माच्या अप्रतिम थ्रोवर धोनीने एबीला बाद केले. डिविलियअर्सने ३८ चेंडूंत तीन चौकारांच्या मदतीने ३० धावा केल्या. पाठोपाठ अर्धशतक करणा-या फा डू प्लेसिसला बाद करुन मोहित शर्माने आफ्रिकेला चौथा धक्का दिला. प्लेसिस बाद झाल्यानंतर दक्षिण आफ्रिकेचा डाव गडगडला. ठराविक अंतराने द. आफ्रिकेचे फलंदाज बाद होत गेले. अखेर ४०.२ षटकात १७७ धावांतच द.आफ्रिकेचा डाव संपुष्टात आला. फिरकीपटू आर.अश्विनने सर्वाधिक तीन गडी बाद केले.
तत्पूर्वी, भारताने सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. सामन्याला सुरुवात झाल्यानंतर भारत नऊ धावांवर असताना रोहित शर्माच्या रुपाने दक्षिण आफ्रिकेला पहिले यश मिळाले. रोहित शर्मा भोपळा न फोडता माघारी परतला. त्यानंतर शिखर आणि विराटने डावाला आकार देण्यास सुरवात केली. विराटने शिखरच्या साथीने दुस-या विकेटसाठी महत्त्वपूर्ण १२७ धावांची भागीदारी साकारली. अर्धशतकासाठी चार धावा बाकी असताना विराट इम्रान ताहिरच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला.विराट कोहली ४६ धावांवर बाद झाला.
त्यानंतर धवन आणि अजिंक्य रहाणेची जोडी मैदानावर जमली. या दोघांनी तिस-या विकेटसाठी १२५ धावांची भागीदारी केली. तर भारताचा सलामीवीर शिखर धवनने दमदार शतक झळकावले. १२२ चेंडूत त्याने हे शतक साकारले. शिखर १३७ धावांवर बाद झाला. शिखर बाद झाल्यानंतर मात्र भारताचा डाव कोसळला. अखेरच्या ६.३ षटकात भारताने केवळ ४६ धावा करत पाच गडी गमावले. शिखरपाठोपाठ रैना केवळ सहा धावा करुन बाद झाला. त्यानंतर ७९ धावांची खेळी करत रहाणेही बाद झाला. कर्णधार महेंद्रसिंग धोनी या सामन्यात पुन्हा एकदा अपयशी ठरला. त्याने १८ धावा केल्या. भारताने ५० षटकात सात गड्यांच्या मोबदल्यात ३०७ धावा केल्या. द. आफ्रिकेच्या मॉर्केलने सर्वाधिक दोन विकेट घेतल्या.
संक्षिप्त धावफलक
भारत – सात बाद ३०७(५०) विजयी शिखर धवन(१३७), अजिंक्य रहाणे(७९),विराट कोहली(४६)
द.आफ्रिका – सर्वबाद १७७(४०.२), फाफ ड्यु प्लेसिस(५५),
सामनावीर – शिखर धवन(१३७)
0
पानसरेंच्या मारेक-यांची माहिती देणा-यास पाच लाखांचे बक्षिस
कोल्हापूर – कामगार, कष्टकरी, उपेक्षितांचे नेते आणि महाराष्ट्राच्या पुरोगामी चळवळीचे ऊर्जाकेंद्र असलेल्या कॉम्रेड गोविंदराव पानसरे यांच्या मारेक-यांचा शोध लावण्यात अद्याप पोलिसांना यश आलेले नाही. पोलिसांनी पानसरेंवर हल्ला करणा-यांची माहिती देणा-यास पाच लाखांचे बक्षिस देण्याची घोषणा केली आहे. कोल्हापूर जिल्ह्याचे पोलिस अधिक्षक मनोजकुमार यांनी ही माहिती दिली. यासंदर्भात माहिती देणा-याचे नाव गुप्त ठेवण्यात येईल असेही ते म्हणाले. माहिती देण्यासाठी ०९७६४००२२७४ या क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.
पोलिसांनी पानसरे यांच्या पत्नी उमा यांची सुरक्षा वाढवली आली आहे. उमा यांच्यावर अॅस्टर आधार हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. त्या प्रत्यक्ष घटनेच्या साक्षीदार असल्याने पोलिस प्रशासनाने बंदोबस्त वाढवला आहे.
पानसरे आणि त्यांच्या पत्नी उमा यांच्यावर १६ फेब्रुवारी अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला होता. पाच दिवस पानसरेंची मृत्यूशी झुंज सुरू होती. शुक्रवारी रात्री पावणेअकरा वाजता मुंबईत पानसरेंची प्राणज्योत मालवली. त्यांच्या मारेक-यांना लवकरात लवकर अटक करण्याची मागणी सर्व डाव्या पक्षांसह समाजातील सर्व स्तरातून होत आहे.
0
बांगलादेशमध्ये १०० प्रवाशांनी भरलेली बोट बुडाली

ढाका – बांगलादेशमध्ये पद्मा नदीत १०० हून अधिक प्रवाशांनी खच्चून भरलेल्या एका प्रवासी बोटीला रविवारी अपघात झाला. या दुर्घटनेत अनेक जण ठार झाल्याची भिती व्यक्त करण्यात आहे मात्र नेमका आकडा अद्याप समोर आलेला नाही.
राजबारी भागातील दौलतदिया येथून पतुरियाच्या दिशेने ही बोट निघाली होती. या बोटीत सुमारे १०० हून अधिक प्रवासी प्रवास करत होते. या दुर्घटनेत किती जण ठार अथवा बेपत्ता झाले आहेत याची अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही. घटनास्थळी बचावकार्य युद्धपातळीवर सुरु आहे
कार्गो ट्रॉलरची या बोटीला धडक बसल्याने ही दुर्घटना झाल्याचे मणिकगंज जिल्ह्यातील वरिष्ठ पोलीस अधिका-यांनी सांगितले. गेल्या दहा दिवसांतील ही दुसरी घटना आहे.
यापूर्वी १३ फेब्रुवारी रोजी बांगलादेशमधी पैरा नदीत २०० हून अधिक प्रवाशांना घेऊन जाणारी प्रवासी बोट बुडाली होती. यात सुमारे पाच जण ठार झाले होते. तर गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये बांगलादेशमध्येच झालेल्या बोट दुर्घटनेत १३० जण ठार झाले होते.
0
कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येच्या निषेधार्थ आरपीआयचे कार्यकर्त्यांनी मुंबईत रास्ता रोको केला.
0
गुरू रविदास , जयंती विशेष

गुरू रविदासांचा जन्म अशा वेळेस झाला की, ज्यावेळेस शूद्रांवर अन्याय, अत्याचार होत होते. हिंदू समाजव्यवस्थेत जातिवाद, वर्णवाद, रूढिवाद, पुरोहितवाद, अस्पृश्यता वाढत होती. वर्षानुवष्रे चालत ते स्वत: उभे राहिले. रविदासांनी आपल्या अमृतवाणीने संपूर्ण देशाला जागृत केले.
गुरूरविदासांच्या कार्यांची स्मृती अनेक संतांनी केलेली आहे. ज्यात संत तुकाराम, गुरुनानक, गुरूकबीर, संत सेना, संत मीराबाई, संत एकनाथ, संत धन्ना, संत हरिदास, संत दादू, संत नाभादास इ. गुरूरविदासांनी सामाजिक विषमतेविरुद्ध त्या काळात कठीण संघर्ष केला. गुरू रविदासांनुसार ब्राह्मण, मौलवी, शीख, हिंदू, मुसलमान, चांडाळ, क्षत्रिय, वैश्य, शूद्र इ. जेवढी माणसे आहेत ती सर्व सारखी आहेत. या सर्वांना निर्माता एकच आहे. सगळे हाड, मांस, चामड्यापासून तयार झालेले आहेत म्हणून एकमेकांना उच्च-नीच समजू नये, सगळे एकच आहेत.
हिंदू-मुसलमान मंदिर-मशिदीसाठी भांडत असतात. याविषयी गुरू रविदास म्हणतात. मंदिर-मशीद एकच आहे, राम-रहिम एकच आहे. राम मंदिरात नाही आणि अल्ला मशिदीमध्ये नाही म्हणून तुम्ही निर्थक भांडू नका. मंदिर आणि मशिदीमध्ये नतमस्तक होण्याची गरज नाही, कारण परमेश्वर सर्वव्यापी आहे.
ज्याला तुम्ही शोधता तो मथुरा, काशी, हरिद्वार इ. तीर्थस्थानात नाही; तो माझ्या मनात आहे. पोथी, पुराण आणि पुजारी यांच्यामागे लागू नका, असा मोलाचा सल्ला गुरूरविदासांनी दिला. संत मीराबाई गुरू रविदासांकडून दीक्षा घेऊन शिष्या झाली. मीराबाईने मोठय़ा सन्मानाने गुरू रविदासांच्या उल्लेख आपल्या पदांमध्ये केलेला आहे.
”मेरो मन लागो गुरु सो’ अब नरहुंगी अटकी गुरु मिलिया रैदास जी, दीन्ही ज्ञान की गुटकी।”
”रैदास सन्त मिले मोह सत्गुरु दीन्ही सुरत सहदा की।”
”मीरा के प्रभु तेही स्वामी श्री रैदास सत्गुरु जी।”
”मीरा ने गोविंदा नित्या जी गुरु मिल्या रैदास।”
हजारो वर्षांपासून बहुजन समाज गुलामी आणि लाचारीने जीवन जगत आहे. आधुनिक काळात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी या गुलामांच्या स्वातंत्र्यासाठी संघर्ष केला. डॉ. बाबासाहेब म्हणतात, ”गुलामांना गुलामगिरीची जाणीव करून द्या म्हणजे ते बंड करून उठतील आणि आपल्या स्वातंत्र्यासाठी संषर्घ करतील.”
हाच विचार रविदासांनी त्यांच्या काळात ठेवला होता आणि समाजाला गुलामीविरोधात विद्रोह करण्याचा संदेश दिला होता. ज्या व्यवस्थेने बहुजनांसाठी संघर्ष करणार्या अनेक संतांचा छळ केला, अनेक महापुरुषांचा छळ केला, काहीचा खून केला. हजारो वर्षांपासून बहुजन समाज या देशात अपमानित होत आहे. त्याचे एकमेव कारण म्हणजे बहुजन समाजाला त्याच्या गुलामीची, पराधीनतेची जाणीव नाही. आज बहुजन समाज ६000 जातींमध्ये विभागलेला आहे. अनेक धर्मांमध्ये विभागलेला आहे. बहुजन समाजाची धारणा आहे की, ‘ठेवीले अनंते तैसेचि राहावे, चित्ती असू द्यावे समाधान.” तेव्हा त्याला त्याच्या गुलामीविरुद्ध जागृत केल्याशिवाय येणारा काळ, अन्यायमुक्त, शोषणमुक्त होणार नाही. येणारा काळ जर अन्यायमुक्त, शोषणमुक्त करायचा असेल तर समाजातील सुज्ञ लोकांनी स्वत:ची जबाबदारी ओळखून प्रत्येक समाज जागृत करावा लागेल. दीन दु:खी केहीत जउ, वारै अपने प्रान। ‘रविदास’ उह नर सुर कौं, सांचा छत्री जान।। दीन, दु:खी लोकांचे दु:ख नष्ट करण्यासाठी जे झटतात, चंदनासारखे झिजतात, आपल्या प्राणाचे बलिदान देतात तेच खरे शूरवीर आहेत, क्षत्रिय आहेत. आपण सर्व गुरू रविदासांना आपल्या समाजाचे आदर्श महापुरुष मानतो. मार्गदर्शक मानतो. आता आपल्याला विचार करायचा आहे की आपण त्यांना कशाप्रकारे मानतो. आणि खरंच मानीत आहोत का? त्यांनी आमच्या कल्याणासाठी, प्रगतीसाठी आणि हक्क, समानतेसाठी महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले. आपण विचार करायला पाहिजे की, त्यांनी दाखविलेला कल्याणकारी मार्ग आणि महत्त्वपूर्ण सल्ल्याला आपण जीवनात स्वीकारले का? त्यांचा फोटो आदरपूर्वक ठेवल्याने त्यांचे स्वप्न पूर्ण होईल का? किंवा त्यांच्या विचारांना जीवनात समावेश करून त्यांचे स्वप्न पूर्ण होईल का? आमच्या प्रगतीसाठी त्यांनी जो मार्ग दाखविला तो कुणाची भक्ती केल्याने पूर्ण होईल का? की कर्म केल्याने पूर्ण होईल?
”सांडू दे रक्त वाहू दे पाट
क्रांती! कधीचीच बघते तुझी वाट।”
”बता रे पंडित ज्ञानी कौन चाम से न्यार।
चाम का ब्रह्म, चाम का विष्णु,
चाम का सकल पसारा।
चाम काय योगी, चाम का भोगी,
चाम का गुरु तुम्हारा।
कह रैदास सुनो रे पंडित ज्ञानी, चाम का गुरु नाहिं हमारा।
संत शिरोमणी गुरू रविदासजी.
लेखिका – शुभांगी विजय मालखेडे
मो. ९९७0३९६३७0
0
रविवारी महाराष्ट्र बंद

मुंबई, दि. २१ – कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येच्या निषेधार्थ डाव्या संघटांनी उद्या महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. पानसरे यांची हत्या झाल्याने जनतेत आक्रोश आहे. पुरोगामी विचारधारांनी उद्या रस्त्यावर उतरुन कारभार बंद ठेवावा असे आवाहन डाव्या पक्षाचे नेेते भालचंद्र कांगो यांनी केले आहे.
गोविंद पानसरे यांच्या हत्येचे पडसाद राज्यभर उमटत आहे. राज्यात ठिकठिकाणी डाव्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरुन सरकारविरोधात घोषणाबाजी केली. शुक्रवारी रात्री पानसरे यांचे मुंबईत उपचारादरम्यान निधन झाले. त्यांच्या हत्येचे वृत्त समजताच कोल्हापूरमध्ये शोककळा पसरली आहे. आज सकाळपासून कोल्हापूरमधील सर्व व्यवहार बंद ठेवण्यात आले आहेत. डाव्या पक्षाचे नेते भालचंद्र कांगो यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना उद्या (रविवारी) महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. बारावीच्या परीक्षा असल्याने आम्ही आज किंवा सोमवारी बंद ठेवणार नाही. उद्या रविवार असल्याने पुरोगामी विचारांनी बंद पाळावा असे त्यांनी सांगितले.












