पशाची चिंता नाही, हवी फक्त जिद्द..

पशाची चिंता नाही, हवी फक्त जिद्द..

देशात रस्ते किती झाले यापेक्षा,...

पशाची चिंता नाही, हवी फक्त जिद्द..
 नेरळमध्ये घराची भिंत कोसळून पाच जण ठार

नेरळमध्ये घराची भिंत कोसळून पाच जण ठार

रायगड – जिल्ह्यातील कर्जतजवळील...

 नेरळमध्ये घराची भिंत कोसळून पाच जण ठार
चित्त थरारक स्टंट

चित्त थरारक स्टंट

यवतमाळ – येथील ब्रदर्स एट  आर्म्स...

चित्त थरारक स्टंट
गोंदियात धावत्या नॅनोला लागली आग

गोंदियात धावत्या नॅनोला लागली आग

गोंदिया – आमगाव रोडवरील अदासी जवळ...

गोंदियात धावत्या नॅनोला लागली आग

Archive for February, 2015

कॉम्रेडला गोविंद पानसरे यांना अखेरचा लाल सलाम 0

कॉम्रेडला गोविंद पानसरे यांना अखेरचा लाल सलाम

untitled-1_1424523625
कोल्हापूर – कॉम्रेड गोविंद पानसरे यांना पंचगंगेच्या घाटावर कुठलेही धार्मिक विधी न करता अखेरचा निरोप देण्यात आला. त्यांना त्यांची सून आणि नातवाने अग्नी दिला. दसरा चौकातून निघालेली अंत्ययात्रा सायंकाळी सहा वाजता पंचगंगेच्या काठावर आली. कम्युनिस्टांनी अंत्ययात्रेला ‘संघर्षयात्रा’ म्हटले होते. पंचगंगेच्या काठी कार्यकर्त्यांनी पुरोगामी विचारांची शपथ ग्रहण केली आहे. येथे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव, बी.जी.कोळसे पाटील, ज्येष्ठ पत्रकार अनंत दीक्षित यांनी शोकसभेत भाषण केले. तसेच शाहीर संभाजी भगत आणि शितल साठे यांनी क्रांतिगीत गाऊन त्यांना श्रद्धांजली अर्पण केली.
सुरुवातीला त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी दसरा चौकात ठेवण्यात आले होते. येथे हजारो लोकांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. येथे भावूक वातावरण होते. त्याचबरोबर शहिद कॉम्रेड गोविंद पानसरे अमर रहेच्या घोषणा दिल्या गेल्या. कार्यकर्ते आणि पानसरे यांच्या विचारांवार श्रद्धा असलेले लोक मोठ्या संख्येने हजर होते. यात कामगार, कष्टकरी, विद्यार्थी, कॉम्युनिस्ट कार्यकर्ते, घरकामगार महिलांची संख्या मोठी होती. बहुतेक कार्यकर्ते आणि महिला या लाल रंगाचे झेंडे घेऊन उभे होते. दुपारी दिड ते साधारण तीन वाजता पर्यंत अंत्यदर्शन घेण्यात आले. त्यानंतर अंत्ययात्रा पंचगंगेच्या दिशने निघाली. दरम्यान, माजी न्यायमुर्ती बी.जी.कोळसे पाटील यांनी पानसरेंवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार का नाही? असा सवाल केला.
पानसरे यांचे शुक्रवारी रात्री 10.45 वाजता ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान निधन झाले. त्यांच्यावर 16 फेब्रुवारी रोजी गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. शनिवारी सकाळी मुंबईत त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले. त्यानंतर 10.30 वाजता एअर अॅम्ब्युलन्सद्वारे कोल्हापूरला आणले गेले. यावेळी मुंबई विमानतळावर शासनाचा एकही प्रतिनिधी नव्हता. त्यांचे पार्थिव मुंबई विमानतळावर तासभर रखडल्याचा आरोप आमदार कपिल पाटील यांनी केला.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाने (भाकप) शनिवारी कोल्हापूर बंद पुकारला होता तर, रविवारी महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. यात सर्व डाव्या पक्षांसह भारिप-बहुजन महासंघ, रिपब्लिकन पक्ष, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस देखील बंद मध्ये सहभागी असणार आहे.
कॉम्रेड पानसरे यांच्या अंत्यविधीसाठी शासनाचा एकही प्रतिनिधी उपस्थित नव्हता. पानसरेंवरील हल्ल्यानंतर पाच दिवसांनी त्यांचे निधन झाले. अद्याप पर्यंत त्यांच्या मारेकर्‍यांचा सुगावा लागलेला नाही. यामुळे कार्यकर्त्यांमध्ये संतप्त भावना आहेत. त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन मंत्रिमंडळातील कोणीही पानसरेंच्या अंत्ययात्रेत सहभागी होणार नाही, अशी शक्यता सुत्रांनी वर्तवली होती.
कोल्हापूरमध्ये शनिवारी भाकपचे राज्यस्तरीय अधिवेशन होणार होते. या अधिवेशनाचे कॉम्रेड पानसरे अध्यक्ष असणार होते. त्यांच्यावर 16 फेब्रुवारी रोजी हल्ला झाल्यानंतरही अधिवेशन रद्द करण्यात आले नाही. आज त्याच अधिवेशनाचे त्यांच्या शोकसभेत रुपांतर झाले. अधिवेशनासाठी मुंबईसह नाशिक, औरंगाबाद, पुणे येथून मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते आले होते. दुर्दैवाना त्या सर्वांना पानसरे यांच्या अंत्ययात्रेत सहभागी व्हावे लागले.
कार्यकर्त्यांच्या भावना तीव्र
भाकपच्या अधिवेशनानिमीत्त राज्यभरातून कार्यकर्ते कोल्हापूरमध्ये आले आहेत. कॉम्रे़ड पानसरेंच्या निधनाची बातमी कळाल्यापासून कार्यकर्त्यांना भावना अनावर होत आहेत. कार्यकर्त्यांनी आजच महाराष्ट्र बंदची हाक देण्याची इच्छा व्यक्त केली होती. मात्र भाकप नेते डॉ. भालचंद्र कांगो यांनी रविवारी महाराष्ट्रात बंद पाळण्यात येईल असे सांगितले आहे.
महाराष्ट्राचा तालिबान होत चालला – भालचंद्र नेमाडे
महाराष्ट्राचा तालिबान होत चाललाय त्याला वेळीच रोखायला पाहिजे. आता महाराष्ट्राला पुरोगामी म्हणण्याची लाज वाटत असल्याची खंत ज्ञानपीठ विजेते लेखक भालचंद्र नेमाडे यांनी व्यक्त केली आहे.
दाभोलकरांची हत्या होऊन दीड वर्ष झाले तरी त्यांचे मारेकरी का पकडले जात नाही? असा सवाल करुन नेमाडे यांनी राज्यातील सरकार आणि पोलिसात अपात्र माणसे असल्याचे म्हटले आहे. कॉम्रेड पानसरेंच्या हत्येनंतर महाराष्ट्राला पुरोगामी कसे म्हणावे असा सवाल त्यांनी केला. ते म्हणाले आता या राज्याला पुरोगामी म्हणण्याची लाज वाटत आहे.
आभाळ फाटले
आमच्या डोक्यावरचे आभाळ फाटले आहे. बोटभर चिंधीने आम्ही ते सांधू शकणार नाही, अशी प्रतिक्रिया शेतकरी कामगार पक्षाचे नेते एन.डी.पाटील यांनी व्यक्त केली. दाभोलकरांच्या हत्येला दीड वर्ष झाले तरी मारेकरी मोकाट आहे. तेव्हा आम्ही म्हणालो होतो, सामाजिक समतेच्या लढ्यातील हे शेवटचे बलिदान आहे. दुर्दैवाने दीडवर्षात कॉम्रेड गोविंद पानसरेंसारखा योद्धा आम्ही गमावला. आता कार्यकर्त्यांचे सांत्वन करण्यासाठी आमच्याकडे शब्द नाहीत. महाराष्ट्र सरकारकडे राजकीय इच्छाशक्ती नसल्याने राज्यात हे घडत आहे, अशी तीव्र प्रतिक्रिया एन.डी. पाटील यांनी व्यक्त केली.

 

February 21, 2015 in मुख्य पान
ऑटीस्टीक विद्यार्थ्यांना 'कॅल्सी'ची परवानगी 0

ऑटीस्टीक विद्यार्थ्यांना ‘कॅल्सी’ची परवानगी

E0-A4-95-E0-A5-85-E0-A4-B2-E0-A4-95-E0-A5-8D-E0-A4-AF-E0-A5-81-E0-A4-B2-E0-A5-87-E0-A4-9F-E0-A4-B0
मुंबई – ‘ऑटीस्टीक’ विद्यार्थ्यांना करावी लागणारी आकडेमोड सोपी व्हावी, यासाठी १२वीच्या परीक्षेतील गणित विषयासह भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, बुक कीपिंग, अकाऊंटण्सी या विषयांसाठी साधा (बेसिक) कॅलक्युलेटर वापरण्याची परवानगी देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय शिक्षण मंडळाने घेतला आहे. शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी ही माहिती दिली. ही सुविधा ११वीच्या विद्यार्थ्यांनाही मिळणार आहे.
लर्निंग डीसॲबिलीटीज आणि ऑटीस्टीक असणाऱ्या ११वी आणि १२वीच्या विद्यार्थ्यांना बेसिक कॅलक्युलेटर वापरता येणार आहे. तो विद्यार्थ्यांना स्वत:च आणावा लागेल. मोबाईलमधील कॅलक्युलेटर किंवा तत्सम कॅलक्युलेटर वापरता येणार नाही, असेही तावडे यांनी स्पष्ट केले.
लोकप्रतिनिधी, शासकीय अधिकारी, पालक संघटना, शिक्षक आणि शिक्षणतज्ज्ञांनी ऑटीस्टीक विद्यार्थ्यांना गणितीय संकल्पनांसाठी अशा प्रकारचा कॅलक्युलेटर परीक्षेच्या काळात वापरण्यास परवानगी देण्याची मागणी अनेकदा केली होती. त्याची दखल घेत शालेय शिक्षणमंत्री तावडे यांनी हा निर्णय घेतला. ११वी आणि १२वीच्या विद्यार्थ्यांना ही सुविधा देण्याची सूचना परीक्षा केंद्र संचालकांना देण्यात आल्या आहेत; तसेच या परिपत्रकाच्या सूचना परीक्षा केंद्रांवर प्रसिध्द करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.

February 21, 2015 in रोजगार
चळवळीतील नेत्यांना संरक्षण द्या! - माणिकराव ठाकरे 0

चळवळीतील नेत्यांना संरक्षण द्या! – माणिकराव ठाकरे

download
मुंबई – डॉ. नरेंद्र दाभोलकर आणि कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येनंतर राज्यातील पुरोगामी आणि सामाजिक चळवळीतील नेत्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्यामुळे यापुढील काळात अशा चळवळीतील नेत्यांना सरकारने संरक्षण द्यावे, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
कॉ. पानसरे यांच्या हत्येने महाराष्ट्राच्या पुरोगामी प्रतिमेला तडा गेला आहे. या घटनेमुळे राज्यात प्रतिगामी आणि सनातनी विचारधारा डोके वर काढत असल्याचे दिसते. या पार्श्वभूमीवर पुरोगामी आणि सामाजिक चळवळीतील; तसेच पीडित, शोषितांसाठी आवाज उठवणाऱ्या सर्वच नेत्यांना संरक्षण देण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे राज्य सरकारने तातडीने अशा नेत्यांच्या सुरक्षेचा आढावा घेऊन त्यांना संरक्षण देण्यासाठी ठोस पावले उचलावीत, असे ठाकरे यांनी पत्रात म्हटले आहे.
विचारांशी लढाई विचारानेच झाली पाहिेजे, अशी भूमिका घेऊन स्वस्थ बसणे योग्य नाही. धर्म आणि संस्कृती रक्षणाच्या नावाने गुंडगिरी सुरू आहे. देशात वैचारिक दहशतवाद थैमान घालत आहे. या सर्व प्रवृत्तींना रोखले नाही, तर आगामी काळात देशाला गंभीर परिणाम भोगावे लागतील, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली.
कॉ. पानसरे यांच्या मारेकऱ्यांना तत्काळ अटक करावी, अशी मागणीही त्यांनी केली. आवश्यकता भासल्यास या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवावा; तसेच भविष्यात अशा घटनांची पुनरावृत्ती टाळायची असेल तर, सनातन व प्रतिगामी विचारधारेचे समर्थन करणाऱ्या संघटनांवर तातडीने कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी त्यांची मागणी आहे.

February 21, 2015 in मुख्य पान
धार्मिक अहंकारापेक्षा देशाचा सन्मान मोठा-आ.प्रा. जोगेंद्र कवाडे 0

धार्मिक अहंकारापेक्षा देशाचा सन्मान मोठा-आ.प्रा. जोगेंद्र कवाडे

2014-09-07~Jogendra-Kawade-Girish-Gandhis-65th-birthday_ns
यवतमाळ, दि. २१ – साध्वी, महाराजांकडून सुरू असलेले वक्तव्य राष्टÑहिताचे मुळीच नाही. धार्मिक अहंकारापेक्षा देशाचा सन्मान मोठा आहे, अशा शब्दात पिरिपाचे अध्यक्ष आ. प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी टीका केली. विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
अल्पसंख्याक समाजाचे नैतिक रक्षण करण्याची जबाबदारी बहुसंख्य समाजावर असते. दुर्देवाने मात्र सध्या गळचेपी धोरण सुरू आहे. देशात असेच सुरू राहिले तर अराजकता माजल्याशिवाय राहणार नाही, अशा इशारादेखील आ.प्रा.कवाडे यांनी दिली. २६ जानेवारीच्या जाहिरातीमधून भारतीय राज्यघटनेच्या प्रास्ताविकात असलेले धर्मनिरपेक्ष व समाजवाद हे शब्द वगळण्यात आले. हा देशाची अखंडता व एकात्मतेवर घाला घालण्याचा प्रयत्न आहे. त्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माफी मागावी, अशी मागणी केली. नरेंद्र दाभोळकर, गोविंद पानसरे यांच्या हत्येमागे गोडसेप्रवृतीचा हात असल्याचा आरोपही आ. कवाडे यांनी केला. रिपब्लिकन ऐक्य झाल्यास पक्षाचे विलिकरण करण्यात यावे, त्यासाठी माझा सर्वप्रथम पुढाकार असेल. प्रत्येकाने निवडणूक आयोगाकडून गटाची मान्यता रद्द करून घ्यावी, रिपब्लिकन ऐक्यासंदर्भात विचारलेल्या एका प्रश्नावर भूमिका स्पष्ट केली. यावेळी विदर्भ अध्यक्ष चरणदास इंगोले, खडसे, कृष्णा परिपगार, कृष्णा रंगारी, रवी श्रीरामे, सुरेश मेश्राम, यू.पी. इंगोले, बंडू तागडे यांच्यासह पीरिपाचे पदाधिकारी उपस्थित होते.

 

February 21, 2015 in महाराष्ट्र
दिल्लीत महिलेवर सामूहिक बलात्कार 0

दिल्लीत महिलेवर सामूहिक बलात्कार

repd

नवी दिल्ली- राजधानी दिल्लीत एका नायजेरियन महिलेवर सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पिडीत महिलेने या प्रकरणी तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी चार जणांना ताब्यात घेतले आहे.
पिडीत महिला दक्षिण दिल्लीतील छत्तरपूर येथून घरी जाण्यास निघाली होती. यावेळी गाडीत बसलेल्या राकेश, सनी, दीपक आणि जॉन्सन यांनी या महिलेला लिफ्ट देऊ केली आणि तिनेही ती स्वीकारली.
यादरम्यान या चौघांनी परिस्थितीचा फायदा घेत तिच्यावर चालत्या कारमध्ये सामूहिक बलात्कार केला आणि त्यानंतर तिला गाडीबाहेर फेकून दिले. चिला बॉर्डरजवळील पोलीस ठाण्यापासून काही अंतरावर तिला गाडीतून फेकून दिले आणि ते चौघेही पसार झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.
दरम्यान, पिडीत महिलेला लिफ्ट दिल्याचे आरोपींनी मान्य केले आहे मात्र तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप त्यांनी फेटाळून लावला आहे.

February 21, 2015 in मुख्य पान
कॉम्रेड गोविंद पानसरे यांचे निधन 0

कॉम्रेड गोविंद पानसरे यांचे निधन

pansare_kolhapur_medical-216x160
मुंबई- ज्येष्ठ कम्युनिस्ट नेते, पुरोगामी विचारवंत कॉम्रेड गोविंदराव पानसरे यांचे शुक्रवारी रात्री पावणेअकरा वाजण्याच्या सुमारास मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात निधन झाले. गेल्या पाच दिवसांपासून मृत्यूशी सुरु असलेली झुंज अखेर शुक्रवारी थांबली. ते ८२ वर्षांचे होते.
सोमवारी १६ फेब्रुवारीला कोल्हापुरातील राहत्या घराजवळ कॉम्रेड पानसरे आणि त्यांची पत्नी उमा यांच्यावर गोळीबार झाला होता. त्यानंतर त्यांच्यावर कोल्हापुरातील अॅस्टर आधार रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र त्यांना पुढील उपचारासाठी शुक्रवारी सायंकाळी त्यांना कोल्हापूरहून हवाई रुग्णवाहिकेद्वारे मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात हलवण्यात आले होते.
सायंकाळी सात वाजेपर्यंत त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे रुग्णालयाच्या वतीने सांगण्यात आले. त्यानंतर रात्री नऊच्या सुमारास त्यांना फुफ्फुसात रक्तस्राव झाला. त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, खासदार सुप्रिया सुळे, रिपाई नेते रामदास आठवले यांनी रुग्णालयास भेट देऊन पानसरे यांचे अंतिम दर्शन घेतले. सकाळी साडेदहा वाजता हवाई रुग्णवाहिकेद्वारे पानसरे यांचे पार्थिव कोल्हापूरात नेण्यात येणार आहे. दुपारी दोन वाजेपर्यंत कोल्हापुरातील दसरा चौकात त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर पंचगंगेच्या काठावर अंत्यविधी होणार आहेत.
अहमदनगरमधील श्रीरामपूर तालुक्यातील कोल्हार या गावात पानसरे यांचा जन्म झाला. तरुण वयात राष्ट्र सेवा दलाच्या मुशीत घडलेले पानसरे नंतर कम्युनिस्ट चळवळीकडे वळले. शोषित, वंचित, उपेक्षित कामगार, कष्टकरी वर्गासाठी ते अखेरच्या श्वासापर्यंत लढले. त्यांचे सध्याचे वास्तव्य कोल्हापुरात असले तरी संबंध महाराष्ट्रात पुरोगामी राजकीय चळवळीत ते आघाडीवर होते. कोल्हापूरच्या टोलविरोधी आंदोलनात ते असेच आघाडीवर राहिले होते. उपेक्षितांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी मोठा संघर्ष केला.
दरम्यान, पाच दिवसांचा कालावधी लोटला असला तरी अद्याप या हल्ल्यातील आरोपींना पकडण्यात पोलिसांना अपयश आले आहे.
लाल सलाम…!
कॉ. गोविंद पानसरे यांच्या निधनाने एक झुंजार आणि लढवय्या नेता आपल्यातून हिरावून नेला, याचे मला अतिशय दु:ख वाटते.- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
कॉ. गोविंद पानसरे यांच्या निधनाने संपूर्ण महाराष्ट्राचे नुकसान झाले आहे. – खासदार सुप्रिया सुळे
कॉ. गोविंद पानसरे यांच्या निधनाने डाव्या चळवळीबरोबरच शोषित, दलित समाजाचे नुकसान झाले आहे – रिपाइं नेते रामदास आठवले

February 21, 2015 in मुख्य पान

२६ विद्यार्थ्यांना विष बाधा

 

भिवंडी – भिंवडी येथील एका आश्रम शाळेतील २६ विद्यार्थ्यांना विष बाधा झाल्याची माहिती समोर आली आहे. २६ विद्यार्थ्यांपैकी दोन जणांची प्रकृती गंभीर असून त्यांना ठाणे येथील हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.
एका खासगी वृत्तवाहिनीने दिलेल्या माहितीनुसार शाळेतील काही विद्यार्थ्यांनी दुपारच्या वेळात विहिरीतील पाणी प्यायले. त्यानंतर थोड्याच वेळात या विद्यार्थ्यांना मळमळ, पोटदु:खीचा त्रास जाणवू लागला. एका पाठोपाठ एक असे २६ जण शिक्षकांकडे गेले. तिथे उपस्थित शिक्षकांनी तत्काळ विद्यार्थ्यांना हॉस्पिटलमध्ये हलवले. २६ पैकी दोन विद्यार्थ्यांची प्रकृती अधिक बिघडल्याने त्यांना ठाणे येथील हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आल्याचे कळते.

February 20, 2015 in रोजगार

भंडाऱ्यात तरुणीचा भरदिवसा खून

भंडारा – मुख्यमंत्री देवंद्र फडणवीस यांच्या विदर्भात भंडारा जिल्ह्यात महिला सुरक्षेचे भरदिवसा वाभाडे काढणारी धक्कादायक घटना घडली आहे. छेडछाड करणाऱ्याने दिवसाढवळ्या महाविद्यालयीन तरुणीचा तीक्ष्ण हत्याराने भोसकून खून केला. देवा गभने असं आरोपीचं नाव आहे. विशेष म्हणजे तरुणीने आरोपीविरोधात छेडछाडीची तक्रार करुनही पोलिसांनी त्याच्यावर काहीच कारवाई केली नाही.
महाविद्यालयात जात असताना आरोपी देवा गभने सतत पीडित तरुणीची छेड काढून तिचा छळ करत होता. त्याच्या छेडछाडीला आणि छळाला वैतागून पीडित तरुणीने आणि तिच्या वडिलांनी पोलिसात तक्रारही दाखल केली होती. पण पोलिसांनी आरोपीविरोधात काहीच कारवाई केली नाही. ही पीडित तरुणी आज महाविद्यालयात जात असताना आरोपीने तिच्यावर रस्त्यातच हल्ला केला. मरेपर्यंत त्याने तिच्यावर धारधार हत्याराने वार केले. यात पीडित मुलीचा जागेवरच मृत्यू झाला. या घटनेनंतर आरोपी देवा गभने याने स्वतःला पोलिसांच्या हवाली केलं. पोलिसांनी अटक करून त्याच्यावर खूनचा गुन्हा दाखल केला आहे.
खूनाच्या घटनेनंतर संतप्त गावकऱ्यांनी पोलिस ठाण्यात बाहेर आंदोलन करत पोलिसांच्या नाकर्तेपणाविरोधात घोषणाबाजी केली. तक्रार करुनही काहीच कारवाई न केल्याने ग्रामस्थ पोलिसांवर संतापले होते. घटनास्थळी मोठ्या संख्यने अजूबाजूच्या गावातीलही गावकरी गोळा झाले. आणि पोलिसांना पीडित तरुणीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी घेऊन जाण्यास नकार दिला, अशी माहिती रामचंद्र भुरे या स्थानिक ग्रामस्थाने दिली.

February 20, 2015 in मुख्य पान

पल्स पोलिओ लसिकरणाचा दुसरा टप्पा 22 फेब्रुवारी रोजी, 2 लाख 66 हजार बालकांना लस पाजणार

यवतमाळ,दि.20: पल्स पोलिओ लसिकरण मोहिमेचा दुसरा टप्पा दि. 22 फेब्रुवारी रोजी जिल्हाभर राबविण्यात येणार आहे. मोहिमेसाठी आरोग्य विभागाने आवश्यक तयारी केली असून पालकांनी आपल्या 0 ते 5 वर्ष वयोगटातील प्रत्येक बालकांचे लसिकरण करून मोहिमेस सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले जिल्ह्यात दुसऱ्या टप्यात शहरी व ग्रामिण भागात एकूण 2 लाख 66 हजार बालकांना पोलिओ लस देण्यात येणार आहे. सदर मोहिम यशस्वी करण्यासाठी ग्रामीण भागात 2343, शहरी भागात 275 असे 2618 बुथ राहणार आहे. तसेच ग्रामीण व शहरी भागात 519 ट्रांझीट टिम तसेच 114 मोबाईल पथके नेमण्यात आली आहे. मोहिमेसाठी पुरेसे मनुष्यबळ नेमण्यात आले आहे. त्यात जिल्हा व तालुकास्तरीय अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, आरोग्य विस्तार अधिकारी याशिवाय 126 वैद्यकीय अधिकारी, 154 आरोग्य सहाय्यक, 795 आरोग्य सेवक, 2295 आशा कार्यकर्ती, 2255 अंगणवाडी सेविका यासह विविध सामाजिक संघटनांचा सहभाग राहणार आहे. जिल्ह्यातील सर्व बालकांचे लसिकरण होण्याच्यादृष्टीने पालकांनी आपल्या 0 ते 5 वर्ष वयोगटातील तसेच नव्याने जन्मास आलेल्या सर्व बालकांना पोलिओ बुथवर आणून लसिकरण करुन घ्यावे व पोलिओ मुक्तीसाठी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. के.झेड. राठोड व जिल्हा शल्य चिकित्सक प्रेमानंद निखाडे यांनी केले आहे.

February 20, 2015 in विदर्भ

पालक सचिव व्ही.गिरीराज यांच्याकडून जलयुक्त शिवार अभियानाच्या कामांची पाहणी

यवतमाळ, दि. 20 : ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव तथा जिल्ह्याचे पालक सचिव व्ही.गिरीराज यांनी आज जिल्ह्यात जलयुक्त शिवार अभियानांतर्गत सुरू असलेल्या कामांना भेटी देऊन पाहणी केली. या भेटीत त्यांनी गावकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी डॅा.मल्लिनाथ कलशेट्टी, गटविकास अधिकारी प्रकाश नाटकर, तालुका कृषी अधिकारी श्री.भवरे, मनपुर गावचे सरपंच श्री.पारधी यांच्यासह गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. जलयुक्त शिवार योजनेंतर्गत मनपुर येथे शेततळ्याचे काम सुरू आहे. या शेततळ्याची श्री.गिरीराज यांनी पाहणी केली. तसेच कामाबाबत गावकऱ्यांशी चर्चा केली. मनपुर येथीलच पाणी शुध्दीकरण प्रकल्पासही त्यांनी भेट दिली. राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत करण्यात आलेल्या रस्ता दुतर्फा वृक्ष लागवडीची पाहणीही त्यांनी केली. यावेळी उपस्थित सरपंच, ग्रामसेवक यांना वृक्षांची निगा राखण्याचे निर्देश त्यांनी दिले. जास्तित जास्त झाडे जगली पाहिजे, असे ते म्हणाले. जलयुक्त शिवार अभियानाची माहितीही त्यांनी यावेळी गावकऱ्यांकडून घेतली.

February 20, 2015 in विदर्भ
खुनाच्या प्रयत्नातील पाच आरोपींना अटक, दोन तलवारी जप्त 0

खुनाच्या प्रयत्नातील पाच आरोपींना अटक, दोन तलवारी जप्त

यवतमाळ, दि. २० – खुनाच्या प्रयत्नात असलेल्या पाच आरोपींना दोन तलवारीसह अटक करण्यात आली. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अशोकनगर, पाटीपुरा येथे केली. अंकुश दामोधर रामटेके (३०), रा. पाटीपुरा, आकाश वसंता वानखडे (२३) रा. आष्टा, संजय शंकर शेळके (३०) रा. नागपूर, मंगेश गुलाब नंदपटेल (२८) रा. अशोकनगर यांच्यासह विधीसंघर्ष ग्रस्त बालक अशा पाच जणांना अटक करण्यात आली. तर पोलिसांच्या कारवाईची कुणकुण लागल्याने सय्यद टकल्या व प्रितम उर्फ प्राजी दामोधर रामटेके (३५) दोघेही रा. अशोकनगर हे फरार झाले.
काही इसम अशोकनगरातील सय्यद टकल्या याच्या घरी घातक शस्त्रासह बसून असल्याची टीप सहाय्यक पोलीस निरीक्षक कडून यांना मिळाली. त्यावरून पोलीस अधीक्षक संजय दराडे, पोलीस निरीक्षक संजय पुजलवार यांच्यामागर्दशनात सापळा रचण्यात आला. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने धाड टाकताच पाच जणांना अटक केली. गादीखाली ठेवून असलेल्या दोन तलवारी जप्त केल्या. सदर इसम खून करण्याच्या बेतात होते, अशी माहिती पोलीस सूत्राने दिली. आरोपीविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. ही कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक कडू, ऋषी ठाकूर, अमोल चौधरी, किरण पडघण, शहजाद खान, ओमप्रकाश यादव, भीमराव सिरसाट, वासू साठवणे, मो.शकील, सचिन घुगे, गणेश देवतळे, रेवन जागृत यांनी केली.

February 20, 2015 in विदर्भ
छायाचित्र स्पर्धेत रामदास पद्मावार प्रथम 0

छायाचित्र स्पर्धेत रामदास पद्मावार प्रथम

PurskarPhoto 01
दिग्रस, दि. २० – सार्वजनिक शिवजयंती उत्सव समिती यवतमाळच्या वतीने आयोजीत छायाचित्र स्पर्धेत येथील छायाचित्रकार रामदास पद्मावार यांनी प्रथम पुरस्कार पटकाविला. शिवजयंतीनिमित्त आझाद मैदान यवतमाळ येथे एका समारंभात पद्मावार यांना हा पुरस्कार देण्यात आला. या कार्यक्राच्या अध्यक्षस्थानी आ. ख्वाजा बेग तर प्रमुख पाहुणे म्हणून निवासी उपजिल्हाधिकारी राजेश खवले, सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष डॉ. दिलीप महाले, जिजाऊ ब्रिगेडच्या राज्याध्यक्षा छाया महाले, विजया थोटे, ज्ञानेश्वर रायमल, स्मीता गवळी, नरेंद्र उन्हाळे, इजाज जोश, प्रशांत ठाकरे उपस्थित होते.

February 20, 2015 in विदर्भ
 २२ हजार विद्यार्थी देणार बारावीची परिक्षा, १५६ बैठे व सात भरारी पथकाची निर्मीती 0

२२ हजार विद्यार्थी देणार बारावीची परिक्षा, १५६ बैठे व सात भरारी पथकाची निर्मीती

images (1)
यवतमाळ, दि. २० – इयत्ता बारावीच्या परीक्षेला उद्यापासून सुरूवात होणार असून, टर्निंग पॉर्इंट ठरणाºया परीक्षेला जिल्ह्यातील २२ हजार विद्यार्थी सामोरे जाणार आहे. एकूण ९९ परीक्षा केंद्रावर परीक्षा घेण्यात येणार आहे. चिटोरेबहाद्दरांना रोखण्यासाठी यंदाही कॉपीमुक्त अभियान राहणार आहे. त्यासाठी १५६ बैठे पथकांसह सात भरारी पथकाचा वॉच राहणार आहे.
करिअर कशात करायचे, यासाठी बारावीची परीक्षा महत्वाची ठरते. मायमराठीच्या पेपरने सुरू होणारी परीक्षा २२ हजार विद्यार्थी देणार आहे. गैरमार्गाशी लढा उपक्रमातंर्गत कॉपीमुक्त अभियान राबविण्यात येत आहे. कुठेही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी विशेष खबरदारी घेण्याच्या सूचना शिक्षण विभागाकडून करण्यात आल्या आहेत. परीक्षा केंद्रावर अनुचित प्रकार आढळल्यास केंद्रप्रमुख, संचालक, पर्यवेक्षक यांना जबाबदार धरण्यात येईल. तसेच शाळेची मान्यता रद्द करण्याचा इशारा जिल्हाधिकारी राहुल रंजन महिवाल यांनी दिला आहे. परीक्षा सुरू होण्यापूर्वीपासून तर संपेपर्यंत प्रत्येक केंद्रावर बैठे पथकाचा ठिय्या राहणार आहे. त्यासाठी १५६ पथकांची निर्मिती करण्यात आली आहे. सोबतच सात भरारी पथकही राहणार आहे. ही पथके अकस्मात कुठल्याही परीक्षा केंद्रावर भेट देऊ शकतात. भारनियमनामुळे विद्यार्थ्यांना पेपर सोडविण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागू नये म्हणून जनरेटरची व्यवस्था करण्याचे निर्देश यापूर्वीच देण्यात आले आहे. कॉपी आढळल्यास केंद्र प्रमुख, संचालक, पर्यवेक्षक यांच्यावर कारवाईची कुºहाड कोसळणार असून, शाळांची मान्यता रद्द करण्याचा इशारा देण्यात आल्याने संस्थाचालकांचे धाबे आतापासूनच दणाणले आहे.

February 20, 2015 in विदर्भ

बिहारचे मुख्यमंत्री जीतराम मांझी यांचा राजीनामा

 

पाटणा – आपल्याकडे बहुमत असल्याचा दावा करणारे बिहारचे मुख्यमंत्री जीतराम मांझी यांनी नेमक्या परीक्षेच्या दिवशी म्हणजे शुक्रवारी बिहार विधानसभेत बहुमत सिध्द करण्याआधी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला.
त्यामुळे मांझी यांचा बंडाचा बार फुसका ठरला असून, यामध्ये भाजपाची सपशेल हार झाली आहे. कारण मांझींच्या बंडाला भाजपाने पाठिंबा दिला होता.
बिहार विधानसभेत विश्वासदर्शक ठराव मांडला जाण्याच्या तासभर आधी मांझी यांनी राजभवनावर जाऊन राज्यपाल केशरीनाथ त्रिपाठी यांची भेट घेतली. या भेटीनंतर प्रधान सचिवांनी मांझी यांच्या राजीनाम्याची घोषणा केली.
मांझी यांच्या राजीनाम्यामुळे नितीश कुमार यांचा बिहारच्या मुख्यमंत्रीपदी आसनस्थ होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. नितीश कुमार यांना स्वपक्षातल्या ९७ आमदारांसह राजद, काँग्रेस आणि सीपीआयच्या आमदारांचा पाठिंबा आहे. नितीश कुमार यांच्याजवळ १२८ आमदारांचा पाठिंबा आहे.
याउलट माझींकडे स्वपक्षाच्या आठ आणि भाजपाच्या ८७ आमदारांचा पाठिंबा होता. पण या पाठिंब्यावर बहुमत सिध्द करता येणार नाही हे लक्षात येताच, मांझींनी बहुमताच्या लढाईत पराभव पत्करण्यापेक्षा राजीनामा देण्याचा पर्याय स्वीकारला.
मला पाठिंबा देणा-या आमदारांना जीवे मारण्याच्या धमक्या येत होत्या म्हणून मी राजीनामा दिला अशी सारवासारव मांझींनी केली आहे. गुप्त मतदान घेतले असते तर, मला १४० आमदारांनी पाठिंबा दिला असता असाही मांझी यांचा दावा आहे.
एकूणच भाजपाने मांझींच्या खांद्यावर बंदूक ठेवून नितीश यांच्यावर नेम साधण्याची चाल रचली होती. पण ऐनवेळी मांझींनी माघार घेतल्याने भाजपाचा डाव फसला. लोकसभा निवडणुकीत बिहारमध्ये झालेल्या जनता दल युनायटडेच्या दारुण पराभवानंतर नितीश कुमार यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देऊन, त्या ठिकाणी दलित कार्ड खेळत जीतनराम मांझी यांना मुख्यमंत्रीपदाच्या गादीवर बसवले होते. नंतर पक्षाने पायउतार होण्यास सांगितले. तेव्हा मांझींनी मुख्यमंत्रीपद सोडण्यास नकार देत नितीश कुमार यांना आव्हान दिले.

February 20, 2015 in देश-विदेश

आ.कुलकर्णी यांना स्वाइन फ्लू

पुणे – राज्यातील स्वाइन फ्लू आजाराची लागण झालेल्यांच्या संख्येत वेगाने वाढ होत आहे. पुण्यातील कोथरुड मतदारसंघाच्या भाजप आमदार मेधा कुलकर्णी यांनाही स्वाइन फ्लू या आजाराची लागण झाली आहे. त्यांच्यावर एका खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असून मेधा कुलकर्णी उपचारांना प्रतिसाद देत आहेत. राज्यात आतापर्यंत स्वाइन फ्लूमुळे ८३ जणांचा मृत्यू झाला आहे तर देशात याच आजारामुळे ७०४ जण दगावले आहेत. दरम्यान, राष्ट्रीय तसेच राज्य पातळीवर आरोग्य विभागातर्फे स्वाइन फ्लूमुळे निर्माण झालेली परिस्थिती हाताळण्यासाठी ठोस उपाययोजना करायला सुरुवात झाली आहे.

February 20, 2015 in मुख्य पान

न्यूझीलंडचा इंग्लंडवर दणदणीत विजय

वेलिंग्टन –न्यूझीलंड विरुध्द इंग्लंड लढतीत न्यूझीलंडने सामन्यावर एकहाती वर्चस्व गाजवत विश्वचषक स्पर्धेतील सलग तिस-या विजयाची नोंद केली.
न्यूझीलंडने इंग्लंडवर आठ गडी आणि तब्बल ३८ षटके राखून दणदणीत विजय मिळवला. शुक्रवारी वेलिंग्टन येथे झालेल्या सामन्यात न्यूझीलंडने इंग्लंडला अक्षरक्ष लोळवले.
आधी टीम साउदीची आग ओकणारी गोलंदाजी त्यानंतर ब्रेंडन मॅककलमच्या वादळाने इंग्लिश आर्मीची दाणादाण उडवून दिली. साउदीने नऊ षटकात ३३ धावा मोजत इंग्लंडच्या तब्बल सात फलंदाजांना माघारी धाडले. त्यानंतर १२४ धावांच्या माफक लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी सलामीला आलेला न्यूझीलंडचा कर्णधार मॅककलम पहिल्या चेंडूपासून इंग्लिश गोलंदाजांवर तुटून पडला.
अवघ्या १८ चेंडूत त्याने अर्धशतक झळकवले. ऑस्ट्रेलिया विरुध्दच्या सामन्यात हॅटट्रीक घेणा-या स्टीव्हन फिनच्या गोलंदाजीच्या तर मॅककलमने अक्षरक्ष चिंधडया उडवल्या. फिनच्या दोन षटकात न्यूझीलंडने ४९ धावा कुटल्या. मॅककलमने २५ चेंडूत ७७ धावा केल्या. यात आठ चौकार आणि सात षटकारांचा समावेश होता. १०५ धावांची सलामी दिल्यानंतर ख्रिस वोक्सने मॅककलमच्या यष्टया वाकवल्या.
मार्टिन गुप्टील २२ धावा करुन बाद झाला. त्यालाही वोक्सने बाद केले. विल्यमसन आणि टेलरने न्यूझीलंडच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. न्यूझीलंडने या सामन्यातील खेळाने आपण विजेतेपदाचे प्रबळ दावेदार का आहोत ते दाखवून दिले. हा विजय न्यूझीलंडचे मनोबल उंचावणारा तर, इंग्लंडचे मनोधैर्य खच्ची करणारा आहे.
तत्पूर्वी नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा इंग्लिश कर्णधार इयॉन मॉर्गनचा निर्णय इंग्लंडच्या चांगलाच अंगलट आला. टिम साउदीच्या आग ओकणा-या गोलंदाजीसमोर इंग्लिश फलंदाज धारातीर्थी पडले.
साउदीच्या भेदक गोलंदाजीमुळे इंग्लंडचा डाव अवघ्या १२३ धावात संपुष्टात आला. साउदीने नऊ षटकात ३३ धावांच्या मोबदल्यात इंग्लंडच्या सात फलंदाजांना तंबूची वाट दाखवली. रुटचा अपवाद वगळता इंग्लंडचा एकही फलंदाज न्यूझीलंडच्या गोलंदाजांचा समर्थपणे सामना करु शकला नाही.
रुटने सर्वाधिक (४६) धावा केल्या. तब्बल सतरा षटके बाकी असताना इंग्लंडचा डाव आटोपला. इंग्लंडचे शेवटचे सहा फलंदाज फक्त १९ धावात तंबुत परतले. संघाची धावसंख्या १०४ असताना मॉर्गनच्या (१७) रुपात इंग्लंडचा चौथा गडी बाद झाला त्यानंतर इंग्लंडच्या डावाला जी गळती लागली ती शेवटपर्यंत थांबलीच नाही. रुट बाद होणारा इंग्लंडचा शेवटचा फलंदाज ठरला. त्याला मिल्नेने व्हिटोरीकरवी झेलबाद केले.
इंग्लंडकून फक्त रुट आणि मॉर्गनमध्ये चौथ्या विकेटसाठी ४७ धावांची मोठी भागीदारी झाली. त्या व्यतिरिक्त इंग्लंडकडून डाव सावरणारी एकही भागीदारी होऊ शकली नाही. सात दिवसात तिसरा सामना खेळणारा न्यूझीलंड आतापर्यंत श्रीलंका आणि स्कॉटलंड विरुध्दचे दोन सामने जिंकून गटात अव्वल स्थानावर आहे.

February 20, 2015 in क्रीडा
विदर्भासाठी महत्वाची घोषणा होणार 0

विदर्भासाठी महत्वाची घोषणा होणार

000000download
मुंबई-(सतिष राठोड /महाराष्ट्र न्यूज नेटवर्क) – मुख्यमंत्री व राज्याचे वित्तमंत्री हे विदर्भाहून अाहेत,त्यामुळे याचा पडसाद राज्याचा बजेटवर दिसेल.विजय केळकर समितीच्या अाग्रहानुसार विदर्भासाठी महत्वाची घोषणा होणार अाहे,अशी माहिती वित्त विभागाच्या सुत्रांनि दिली अाहे.तसेच या बजेटमध्ये एलबीटी रद्द होण्याचे संकेत अाहेत,बजेटमध्ये अारोग्य,शिक्षण,जलसिंचन,रस्ते, या विषयावर विशेष भर देण्यात येणार असून,९ मार्च पासून सुरु होणार्या विधानसभा अधिवेशनामध्ये १७ ते १९ मार्च दरम्यान बजेट मांडण्यात येईल.राज्याचे वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची बजेट मांडण्याची पहिलीच वेळ अाहे,तसेच महसुल वाढविण्यासाठी नविन कर लावणे किंवा जुन्या करात वाढ करण्याच्या एैवजी सरकारी खर्च कमी करण्यावर जोर देणार असल्याची माहिती प्राप्त झाली अाहे.

February 20, 2015 in महाराष्ट्र
अल्पवयीन मुलीवर बलात्कार, पत्नीनं केली मदत 0

अल्पवयीन मुलीवर बलात्कार, पत्नीनं केली मदत

i00000mages
कल्याण,महाराष्ट्र न्यूज नेटवर्क,(सतिष राठोड) – कल्याण पश्चिमच्या वायले नगर,खडकपाडा परिसरात माधव सृष्टी संकुलात घरकाम करणार्या १५ वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाल्याची घटना समोर अाली अाहे.
गेल्या २२ दिवसांपूर्वी अारोपी सुनिल जगदाणी (३०), व अारोपी सोनिया जगदाणी (२६), या दाम्पत्यांनी दिल्लीहून अापल्या घरात काम करण्यासाठी तसेच लहान बाळ सांभाळण्यासाठी १५ वर्षाच्या मुलीला अाणले होतं. अारोपी दांपत्य रात्री दारुच्या नशेत धुंद असतांना त्या घरमालकाने,अापल्या पत्नीची मदत घेऊन १५ वर्षाच्या घरकाम करणार्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला,सकाळी या घटनेची माहिती मुलीने अापल्या नातेवाईकांना देण्याचा प्रयत्न केला. सुनिल अाणि सोनिया यांनी तिला बेदाम मारहाण केले व जिवे मारण्याची धमकी दिली.पिडित मुलीने कशी तरी सुटका करत,अापल्या घरी जाण्यासाठी हरिद्वार एक्सप्रेस कल्याण स्टेशनहून पकडली.पुढे इगतपुरी स्टेशनवर तिला टीसीने पकडले व रेल्वे पोलीसांना सोपविण्यात अाले,तिथे हा सगळा घडलेला प्रकार उघड झाल्यावर अारपीएफ ने महात्मा फुले पोलीस स्टेशनला कळवले. सोनिया जगदाणीला पकडण्यात अाला अाहे.अद्याप बलात्कार करणारा अारोपी सुनिल जगदाणी हा फरार असुन पुढचा तपास महात्मा फुले पोलीस स्टेशन करत अाहेत.

February 19, 2015 in मुख्य पान
घेडछाडीला विरोध करणा-या तरुणीची गोळी घालून हत्या 0

घेडछाडीला विरोध करणा-या तरुणीची गोळी घालून हत्या

download (6)
इलाहबाद, दि. १९ – छेडछाडीला विरोध करणा-या तरुणीची गोळी घालून हत्या करण्यात आली असून, आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एटा तालुक्यातील नगला गोपाल गावात संध्याकाळी एक तरुणी वहिनी सोबत नैसर्गिक विधी करता जात असताना भुवनेश व राजू या गाव गुंडांनी तिचा रस्ता अडवत अश्लील चाळे करण्यास सुरवात केली. या दोघांना विरोध करत ही तरुणी घरी पळून जाण्यात यशस्वी झाली. परंतू, राजू व भुवनेश यांनी इतर चौघांना सोबत घेऊन तरुणीच्या घरी जात तिच्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला असता तिच्या वडिलांनी या गावगुंडांना विरोध केला. या झटापटी दरम्यान भुवनेशने गावठी पिस्तुलामधून झाडलेली गोळी पिडित तरुणीच्या मानेला लागली असता त्या तरुणीला स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले असता तिथल्या डॉक्टरांनी आग्रा येथील रुग्णालयात त्वरीत हलवण्यास सांगितले. आग्रा येथे रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच या पीडित तरुणीने प्राण सोडला असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. तसेच राजू व त्याच्या अन्य सहका-यांवर गुन्हा दाखल करण्यात आल्याचेही पोलिसांनी सांगितले आहे.

February 19, 2015 in देश-विदेश
राज्यात स्वाईन फ्लूचा हाहाकार, ८३ जणांचा मृत्यू 0

राज्यात स्वाईन फ्लूचा हाहाकार, ८३ जणांचा मृत्यू

images (3)
मुंबई- राज्यात स्वाईन फ्लूच्या रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. गुरूवारी एका दिवसात १०९ नवे रूग्ण आढळून आले असून एकूण रूग्णांची संख्या ६७८ वर पोहचली आहे. मृतांची संख्या ८३ झाली आहे. गुरूवारी ४ रूग्णांचा मृत्यू झाला असून त्यापैकी दोन हे नागपूरचे तर पुणे आणि लातूरमध्ये प्रत्येक एका रूग्णाचा मृत्यू झाला आहे.
मुंबईत स्वाईन फ्लूची लागण झालेल्या रूग्णांची संख्या २४४ झाली आहे. गुरूवारी १९ नवे रूग्ण आढळले असून एकाचा मृत्यू झाला आहे. मुंबईत मृतांची एकूण संख्या १० वर गेली आहे. स्वाईन फ्लूचा सर्वात जास्त फटका नागपूरला बसला आहे.
बुधवारी राज्यात स्वाईन फ्लूच्या रूग्णांची संख्याी ५६९ येवढी होती. एका दिवसात ती जवळपास शंभरने वाढून ती ६७८ वर गेली आहे. सध्या राज्यातील वेगवेगळ्या रुग्णालयात स्वाईन फ्लूची लागण झालेले जवळपास ४० रूग्ण हे व्हेंटीलेटरवर आहेत, अशी माहिती आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आली आहे.
रूग्णांची संख्या वाढत असली तरी स्वाईन फ्लूसाठी आवश्यक असलेल्या टॅमी फ्लूच्या गोळ्या मुबलक प्रमाणात उपलब्ध आहेत. शिवाय सर्वच सरकारी रूग्णालयांना सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहेत. स्वाईन फ्लू बाबत जनजागृतीची मोठी मोहीमही सरकार तर्फे हातात घेण्यात आली आहे.

February 19, 2015 in मुख्य पान