रत्नागिरी- पैशाचा पाऊस पाडण्याच्या नावाखाली तरुणींना वाममार्गाला लावणारी दापोलीतील घटना ताजी असताना आता रत्नागिरीतही सेक्स रॅकेटचा पर्दाफाश झाला आहे. पैशाचे आमिष दाखवत अल्पवयीन तरुणींना जाळ्यात ओढणारी टोळीच पोलिसांच्या हाती सापडली आहे.
रत्नागिरीतील चौदा वर्षाच्या युवतीने शहर पोलिसांत दिलेल्या तक्रारीनंतर शहर पोलिसांनी ‘लैंगिक अपराधापासून बालकांचे संरक्षण’ या विशेष कलमांतर्गत गुन्हा दाखल करून घेत भ्रष्टाचार निर्मूलन व अन्याय निवारण समितीच्या महिला पदाधिका-यासह दोघांना अटक केली आहे. तर तिसरा संशयित आरोपी अटकेच्या भीतीने रुग्णालयात दाखल झाल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. सेक्स रॅकेटमध्ये रत्नागिरीतील राजकीय पुढा-यांचादेखील सहभाग असल्याची शक्यता असून, अनेकांचे धाबे दणाणले आहेत.
रत्नागिरी शहर पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक रवी जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार अल्पवयीन युवतीने दिलेल्या तक्रारीनंतर स्वाती ठाकूर या भ्रष्टाचार निर्मूलन व अन्याय निवारण समितीच्या महिला पदाधिका-यासह सुशील, जितू, बाळू, हर्षद व अन्य एक अनोळखी युवक अशा सहाजणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापैकी स्वाती ठाकूर आणि सुशील या दोघांना अटक करून न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दोघांनाही १२ मार्चपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. तिसरा संशयित आरोपी जितू याची प्रकृती बिघडल्याने रुग्णालयात दाखल असून, अन्य तिघाजणांचा शोध सुरू असल्याचे पोलीस निरीक्षक जाधव यांनी सांगितले.
पीडित मुलीचे नववीपर्यंत शिक्षण झाले असून, स्वाती किशोर ठाकूर हिने वैयक्तिक स्वार्थासाठी त्या युवतीला मानसिक त्रास देत लैंगिक शोषण करण्यास भाग पाडल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. पीडित तरुणीने तिच्यावर होणा-या लैंगिक शोषणाची माहिती प्रथम घरच्यांना दिली नंतर रत्नागिरीतील चाईल्ड लाईन संस्थेच्या मदतीने याबाबत शहर पोलीस स्थानकात तक्रार दाखल करण्यात आली. पीडित तरुणीचे मागील एक वर्षापासून लैंगिक शोषण केले जात होते. स्वाती ठाकूर ही पीडित युवतीला वारंवार शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडत होती, असे तक्रारीमध्ये नमूद करण्यात आले आहे. आरोपींनी पीडित युवतीसोबत रत्नागिरीत विविध ठिकाणी शारीरिक संबंध ठेवले. स्वाती ठाकूर हिच्या घरीदेखील पीडित मुलीवर बलात्कार करण्यात आला. शारीरिक संबंध ठेवण्यापूर्वी त्या युवतीला टीव्हीवर अश्लील चित्रफिती दाखवून आणि बिअर पाजून बळजबरी करण्यात आली. स्वाती ठाकूर आणि सुशील यांनी पिडीत युवतीला गोव्यातही नेले. गोव्यात लॉजचे बुकींग करताना पिडीत युवती मुलगी असल्याचे सांगून त्यानंतर स्वाती ठाकूरच्या समोरच बलात्कार करण्यात आल्याची तक्रार त्या युवतीने दिली आहे. पीडित युवतीच्या तक्रारीनंतर शहर पोलिसांनी स्वाती ठाकूर हिच्या घरातील टीव्हीसह सीडीप्लेअर आणि अश्लिल चित्रफिती ताब्यात घेतल्या आहेत. पीडित युवतीने शहर पोलीस स्थानकात दिलेल्या तक्रारीचे व्हिडीओ चित्रीकरण करण्यात आले असून, पिडीत युवतीचे शोषण झालेल्या ठिकाणी पोलिसांनी झाडाझडती घेण्यास प्रारंभ केला आहे. रत्नागिरीत अल्पवयीन युवतींना जाळय़ात ओढणारे रॅकेटच कार्यरत असल्याची शक्यता असून, यातील मोठी टोळी समोर येण्याची शक्यता आहे.
Archive for March, 2014
रत्नागिरीत सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
जनमत चाचण्यांवर बंदी आवश्यक
नवी दिल्ली – लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जनमत चाचण्यांवर बंदी घालावी, अशी मागणी निवडणूक आयोगाने पुन्हा शुक्रवारी केंद्र सरकारकडे केली. मात्र, याबाबत निर्णय घेण्याची कोणतीही घाई नसल्याचे सरकारने स्पष्ट केले. गेल्या आठवडय़ात निवडणूक आयोगाने केंद्रीय विधी खात्याकडे जनमत चाचण्यांना प्रतिबंध करण्यासाठी कायद्यात सुधारणा करण्याची मागणी केली होती. याबाबतचा कायदा २००४मध्ये तयार झाला आहे. या जनमत चाचण्यांवर बंदी घालण्याची मागणी कॉँग्रेसने निवडणूक आयोगाकडे केली होती.मात्र, याबाबत कोणताही निर्णय घेण्याची घाई नसल्याचे सरकारने सांगितले. व्यापक निवडणूक सुधारणांसाठी कायदा आयोगाकडे हे विधेयक छाननीसाठी पाठवले आहे, असे वरिष्ठ सरकारी अधिका-याने सांगितले. विद्यमान कायद्यानुसार मतदानापूर्वी ४८ तास आधी जनमत चाचण्यांना बंदी घालण्याचे अधिकार निवडणूक आयोगाला आहेत.
0
जागतिक महिला दिनाची खास गुगल भेट

मुंबई – आठ मार्च सर्वत्र जागतिक महिला दिन म्हणून साजरा केला जातो. याच धर्तीवर नेहमी प्रयोगशील असणा-या गुगलने महिलादिनानिमित्त खास व्हिडीओ स्वरुपातील गुगल डूडल बनवले आहे. गुगलच्या या डूडलमध्ये गुगल शब्दामधील दुस-या ओ या अक्षरावर क्लिक केल्यास व्हिडीओ सुरु होतो. या व्हिडीओमध्ये जगातील विविध देशातील विविध स्तरातील महिलांनी जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. यासोबतच आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे या व्हिडीओमध्ये मलाला युसुफजाई आणि आशा भोसले यांनीही शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच व्हिडीओ संपल्यानंतर जागतिक महिला दिन अशा संदेश गुगलच्या पेजवर पहायला मिळतो. १९१४ रोजी पहिल्यांदा आठ मार्चला जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला. तेव्हापासून आजतायगत जगभरात सर्वत्र मोठ्या उत्साहात महिला दिन साजरा केला जातो.
0
पासवर्डच्या संरक्षणासाठी नव्या प्रणालीचा प्रस्ताव

ई-मेल अकाउंट, नेटबँकिंग व एटीएम, शेअर बाजाराचे ऑनलाइन व्यवहार इतकेच काय अगदी आपल्या हातात सतत असलेला मोबाइल बंद स्थितीतून पुन्हा सुरू करायचा असेल तरी पासवर्ड आवश्यक ठरतो. पासवर्ड लक्षात ठेवणे हे डोकेदुखीचे काम आहे. तसेच या पासवर्डचे संरक्षण करणे ही कठीण बाब आहे. कारण पासवर्ड चोरून पैसे पळवण्याचा उद्योग जगभरात सुरू आहे. त्यामुळे पासवर्डचे भक्कम संरक्षण करण्याची गरज आहे. नावीन्यपूर्ण पद्धतीने पासवर्डचे संरक्षण करण्याचे संशोधन भारतीय वंशाच्या शास्त्रज्ञांनी यशस्वी केले आहे. यामुळे हॅकर्सपासून पासवर्डचे संरक्षण होऊ शकते.
अलाबामा विद्यापीठ आणि कॅलिफोर्निया विद्यापीठाच्या संशोधकांनी हॅकर्सपासून पासवर्डचे संरक्षण करण्याची नवीन पद्धती शोधून काढली आहे. पासवर्ड साठवून ठेवणा-या सव्र्हरवर हॅकर्सपासून अनेक हल्ले होत असते. ‘लिंक्डइन’ आणि ‘पेपाल’ या कंपन्यांना याचा अनुभव आला आहे, अशी माहिती कम्युटर अॅँड इन्फॉर्मेशन सायन्स विभागाचे सहाय्यक प्राध्यापक नीतेश सक्सेना यांनी दिली.पासवर्ड लक्षात राहावा म्हणून अनेकजण तो अत्यंत सोप्या शब्दात लिहितात. हे पासवर्ड बहुतांशी सव्र्हरमध्ये साठवले असतात. हॅकर्स हे ऑनलाइन हल्ला करून किंवा सव्र्हरची कमकुवत सुरक्षा पाहून हल्ला करतात. त्यासाठी ते पासवर्ड डिक्शनरीचा वापर करतात.सध्या पासवर्डची खात्री पटवण्यासाठी ‘गुगल ऑथेंटिकेटर’ आणि ‘आरएसए सिक्युअर आयडी’ या दोन पद्धती वापरल्या जातात. पण, हॅकर्सच्या हल्ल्याप्रकरणी या पासवर्ड पद्धती निकालात निघाल्या आहेत. फेसबुक ही जगप्रसिद्ध सोशल साइट द्विस्तरीय पासवर्ड पद्धत वापरते.संशोधकांनी ४२ फॅक्टरची योजना आणली आहे. यात स्मार्टफोनवर सिक्युरिटी टोकन येते. संगणकाचे काम बॅँडविड्थवर अवलंबून असते. यात सुरक्षेचे १३ पर्याय दिले आहेत. नवीन पद्धतीत ‘पासवर्ड’ निर्मितीचे काम हे ‘अॅप्स’द्वारे केले जाते. संबंधिताने पासवर्ड टाइप केल्यानंतर स्मार्टफोनद्वारे स्वयंचलित पद्धतीने पासवर्ड निर्मितीचे काम केले जाते.सक्सेना यांच्याबरोबरच मलिहेह शिरवानियन, स्टानिस्लोव्ह जारेकी, नवीन नाथन यांनी पासवर्ड संरक्षणाच्या पद्धतीवर विस्तृत संशोधन केले. आमच्या प्रत्येक प्रस्तावामुळे तुम्हाला अधिक चांगल्या प्रकारची सुरक्षा व्यवस्था मिळू शकेल, असा दावा संशोधकांनी केला आहे.
0
जागतिक महिला दिनाचं सेलिब्रेशन

निर्माती दिग्दर्शिका कांचन अधिकारी दरवर्षी जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने सर्वच क्षेत्रांतल्या मान्यवर महिलांना एकत्र करीत जोरदार सेलिब्रेशन करतात. याही वर्षी यानिमित्ताने अनेकजणी एकत्र आल्या. यात अरूणा इराणी, रोहिणी हटंगडी, किरण जुनेजा, लीना मोगरे, मृणाल कुलकर्णी, प्रतिक्षा लोणकर, वर्षा उसगांवकर, किशोरी शहाणे विज, वैजयंती कुलकर्णी-आपटे, अॅड. निर्मला सामंत-प्रभावळकर, रेखा सहाय अशा अनेक महिलांचा समावेश आहे. या सेलिब्रेशनची काही जोरदार क्षणचित्रे…
0
बहारदार संगीताने सजलेला चित्रपट यशवंतराव चव्हाण – बखर एका वादळाची
१४ मार्च रोजी महाराष्ट्रात प्रदर्शित होणार
महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री, व्यासंगी नेते, अभ्यासू व्यक्तिमत्व, दूरदृष्ट्री असलेलं कार्यकुशल नेतृत्व अशा अनेक बिरुदावल्या लाभलेले व्यक्तिमत्व म्हणजे मा. यशवंतराव चव्हाण. वैयक्तिक आयुष्यासोबतच राजकीय आणि सामाजिक जीवनातही अतिशय आव्हानात्मक परिस्थितींवर यशस्वीपणे मात करणा-या यशवंतरावांचा जीवनपट खूप रंजक असा आहे. त्यांच्या याच जीवनप्रवासावर आधारीत यशवंतराव चव्हाण – बखर एका वादळाची हा जब्बार पटेल दिग्दर्शित चित्रपट येत्या १४ मार्चला प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानची निर्मिती असलेल्या या चित्रपटाची प्रस्तुती महाराष्ट्र शासन आणि एस्सेल व्हिजनची आहे.
यशवंतराव चव्हाण या चित्रपटातून महाराष्ट्र आणि देशाची तत्कालीन राजकीय, सामाजिक परिस्थिती , यशवंतरावांचे दुरदर्शी निर्णय, झंझावाती कारकिर्द पटकथेतून चपखलपणे मांडण्याचं काम ज्येष्ठ लेखक, पत्रकार अरूण साधू यांनी केलं आहे. पटकथेसोबतच चित्रपटातील गीतेही कथानकाचाच एक भाग म्हणून प्रेक्षकांसमोर येणार आहेत. महाराष्ट्राच्या निर्मितीकाळातील लोकसंगीत, साहित्य आणि समाजकारणातील उर्जितावस्था, लोककलांचे महत्त्व लक्षात घेऊन संगीताची मोलाची जबाबदारी आनंद मोडक यांनी या चित्रपटात सांभाळली आहे. चित्रपटात विविध बाजाची एकूण १६ गाणी असून ती अनेक नामवंत गायकांनी स्वरबद्ध केली आहेत.
“यशवंत असा गुणवंत”, “स्वातंत्र्य लढे पेटले”, “स्वातंत्र्याचा पोवाडा”, “यशवंत बहुगुणवंत”, “संयुक्त महाराष्ट्राचा पोवाडा” ही प्रसिद्ध कवी-गीतकार ना. धों. महानोर यांनी शब्दबद्ध केलेली स्फुर्तीदायक गीते आणि “देशभक्ता प्रासाद” हे विनायक करंदीकर यांनी लिहिलेलं गीतही ऐकायला मिळणार आहे. नंदेश उमप आणि सहका-यांनी ही सर्व गीते गायली आहेत. “संगमरवर या नद्यांचे” हे ना. धों. महानोर यांच्याच लेखणीतून उतरलेले गीत रविंद्र साठे आणि विभावरी आपटे यांनी गायलं आहे. यशवंतरावांच्या आई विठाबाई चव्हाण या प्रतिभावान कवयित्रीही होत्या. त्यांच्या याच प्रतिभेची झलक या चित्रपटातील गाण्यांमधूनही बघायला मिळणार आहे. या चित्रपटातील “गडगड आभुटं”, “नादारीचं दीस”, “मायबापाच्या पोटी” या त्यांच्या मुळ रचना यात ऐकता येणार असून या रचनांमध्ये काही शब्दांची भर घालत ना.धों. महानोरांनी त्याला गीताचं स्वरुप दिलं आहे. आणि ही गाणी आपल्या ठसकेबाज आवाजात सादर केली आहेत उर्मिला धनगर यांनी. याशिवाय “सखे नयन कुरंग” हे पारंपरिक बाजाचं गीतही उर्मिलाने गायलं आहे. याशिवाय चित्रपटात “उलटी हो गई तदबीरे सारी” ही मीर-तकी-मीर यांची भावपूर्ण रचना आरती अंकलीकर यांच्या आवाजात ऐकायला मिळणार आहे. “उभविला मळा” ही भैरवी आणि “खालच्या आळीत गातो” ही निराळ्या बाजातील महानोरांची गीते अनुक्रमे रविंद्र साठे आणि आनंद शिदे यांनी गायली आहेत. याशिवाय कुसुमाग्रज यांच्या शब्दप्रतिभेतूनउतरलेलं गर्जा जयजयकार हे गीत शंकर महादेवन यांनी स्वरबद्ध केलं आहे. व्हिडीओ पॅलेसच्या वतीने या चित्रपटाच्या गाण्यांची ध्वनिफित बाजारात उपलब्ध करण्यात आली आहे.
महाराष्ट्राचा हा लाडका नेता आपल्या अभिनयातून साकार करण्याची किमया साधली आहे अशोक लोखंडे यांनी तर लुब्ना सलिम , ओम भुतकर, वैशाली दाभाडे, मीना नाईक, रेखा कामत, सुप्रिया विनोद, सतीश आळेकर, राहूल सोलापूरकर, बेंजामीन गिलानी यांच्या अन्य महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. येत्या १४ मार्च रोजी हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.
0
पोलिस अधिकाºयाच्या वाहनाची दुचाकीला धडक , एक ठार
यवतमाळ – येथून चंद्रपूरकडे जाणाºया पोलीस अधिकाºयांच्या वाहनाने दुचाकीला धडक दिल्याने एक जण ठार झाल्याची घटना आज वाकी नजीक घडली. यामध्ये एक जण जखमी झाला असून मृतकाच्या खिशातून एक लाख रुपये लांबविले.
अंबादास कवडू लिलारे (४५) रा. मोहदरी असे मृतकाचे तर नामदेव किसन मेश्राम (५२) रा. मोहदरी असे जखमीचे नाव आहे. आज सकाळी दुचाकीने (एम.एच. २९/ ९२४७) यवतमाळकडे जात होते. अशातच गंगा फर्टीलायझर जवळ चंद्रपूर येथील पोलीस निरीक्षक मनिष ठाकरे यांच्या कारने (एम.एच. २९ / आर. २०६९) जोरदार धडक दिली. या अपघातामध्ये अंबादास जागीच ठार तर नामदेव हा गंभीर जखमी झाला. यावेळी जखमीना येथील वसंतराव नाईक शासकीय रुग्णालयात दाखल केले, मात्र प्रकृती गंभीर असल्याने त्याला सेवाग्राम येथे हलविण्यात आले. या घटनेची माहिती मिळताच शहर पोलीस, जिल्हा वाहतुक शाखा, दंगल नियंत्रण पथक घटनास्थळी भेट देऊन तणाव नियंत्रणात आणला. मृतक अंबादासने नुकताच कापूस विक्री केला असून त्यापोटी मिळालेली रक्कम एक लाख रुपये त्याच्या सोबत होती. अपघातानंतर त्याच्या खिशातून सदर रक्कम चोरुन नेली. याप्रकरणी शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तपास सुरु आहे.
बेबळा कालव्याचे कामा करण्यास अडथळा , अभियंत्यासह कर्मचाºयांना अडविले
कळंब – तालुक्यात बेंबळा प्रकल्पाच्या कालव्याचे काम करण्यास एका युवकाने अडथळा निर्माण केला आहे. तसेच अभियंत्यास दगडाने मारून उर्वरीत कर्मचाºयांची अडवणूक केली.
शेतीसाठी मुबलक पाणी मिळावे म्हणून तालुक्यात बेंबळा प्रकल्पा अंतर्गत कालवा निर्मीतीचे काम सुरु आहे. बेंबळा कालवे विभागाचे शाखा अभियंता गौतम सिताराम पाटील हे आपल्या कर्मचाºयांसह आज माटेगाव शिवारात कालव्याच्या काम करण्यासाठी जात होते. अशातच माटेगाव येथील पवन अशोक जगताप (२९) याने शाखा अभियंत्याचा रस्ता अडवून कॅनॉलचे काम करण्यास अडथळा निर्माण करून जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच कर्मचाºयांना गावा बाहेर जावू न देता सरकारी कामात अडथळा निर्माण केला. याप्रकरणाची तक्रार शाखा अभियंता पाटील यांनी पोलिस ठाणे गाठून तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी सदर युवकाविरूद्घ भादंवि कलम ३४१, १८६, ३५३, ५०६ अंतर्गत गुन्हा दाखल केला.
महिलांमुळे एकात्मतेची भावना रुजली – विधानाभा उपाध्यक्ष आ. पुरके
यवतमाळ – पुरुषाच्या तुलनेत महिलांच्या साक्षरतेचे प्रमाण ५४ टक्के असून सर्वच आघाड्यावर महिलांची यशस्वी घोडदौड सुरु आहे. बचत गटासारख्या चळवळीतून महिला एकत्रीत झाल्या व त्यामुळेच त्याच्यासह समाजातही एकात्मतेची भावना रुजल्याचे प्रतिपादन विधानसभेचे उपाध्यक्ष आ. प्रा. वसंत पुरके यांनी केले. जागतिक महिला दिनानिमित्त आयोजीत महिला मेळाव्यात ते अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते.
पुढे बोलतांना ते म्हणाले की, इंदिरा गांधीनी समर्थपणे देश हिताचे त्या काळी निर्णय घेतले. त्यांच्या कल्पनेतुन पुढे आलेल्या योजनामुळेच ग्रामीण भागाची प्रगती झाली. आता ही महिलांना स्थानिक स्वराज्य संस्थेप्रमाणेच लोकसभा-विधानसभेतही ५० टक्के आरक्षण देण्याचा मतप्रवाह पक्षात आहे. त्यामुळे समाजातील चांगल्या गोष्टींना वाव मिळावा म्हणून महिलांनी अधिक प्रमाणात राजकीय सहभाग घेण्याची गरजही त्यांनी बोलुन दाखविली. आपल्या मुलांना संस्काराचे धडे दिल्यास मराठी माणसाचा टक्का आयएएस, आयपिएस, आयएफएस सारख्या प्रशासन सेवेत वाढेल असेही ते म्हणाले.राज्याच्या महिला व बालविकास मंत्री वर्षा गायकवाड यांनी राज्यात महिलांसाठी राबविलेल्या योजनांची माहिती दिली. यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आ. वामन कासावार, माजी मंत्री संजय देशमुख, देवानंद पवार, राहुल ठाकरे, महाराष्टÑ प्रदेश महिला काँग्रेसच्या अध्यक्षा कमल व्यवहारे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.
युवकाचे अपहरण
उमरखेड – पैशाच्या वादातून एका युवकाचे पंचायत समिती कार्यालय परिसरातून अपहरण केल्याची घटना घडली. सतिष नामदेव कोकरे रा. चुरमुरा असे अपहृत युवकाचे नाव आहे. त्याचा भाऊ सुशिल कोकरे याने कोल्हापूर येथील साखर कारखान्यातून २ हजार ७४५ रुपयाची उचल केली होती. या पैशाच्या वादाहून सुशिल समजून त्याचा भाऊ सतिषला उमरखेड पंचायत समिती कार्यालय परिसरातून बोलेरोमध्ये (एम.एच. २१/ २००९) कोंबुन पळवून नेले. याप्रकरणी उमरखेड पोलिसांनी बळीराम गडसिंग, मनोज बळीराम गडसिंग, नारायन निखाते रा. काजलगाव जि. कोल्हापूर याच्याविरूद्घ गुन्हा दाखल केला.
गारपिट ग्रस्तांच्या प्रश्नांसाठी आ. राठोड यांचे धरणे
यवतमाळ – जिल्ह्यातील गारपीट व वादळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकºयांना आर्थिक मदतद्यावी यासह विविध मागण्यासाठी आ. संजय राठोड १० मार्च रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करणार आहे.
गारपिट व वादळी पावसामुळे जिल्ह्यातील शेतकºयांचे गहू, हरबरा, बागायती, पिकांचे अतोनात नुकसान झाले असून या संदर्भात विधानसभा सभागृहात प्रश्न उपस्थित झाला आहे. नुकसानग्रस्त शेतकºयांना मदतीचे आश्वासन मुख्यमंत्री ना. पृथ्वीराज चव्हाण यांनी दिल्यानंतरही अंमलबजावणीला सुरुवात झाली नाही. सर्वेक्षण अहवाल या बाबतील वेळ न घालवता शेतकºयांना तातडीने मदत करावी, बँकाची सक्तीची वसुली थांबवावी, पिकांची पैसेवारी कमी असल्यामुळे दुष्काळी परिस्थितीत मिळणाºया सवलती मिळावा, २०१३ मध्े अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकºयांना आर्थिक मदत मिळावी या मागण्यांसाठी धरणे आंदोलन करणार आहे. या धरणे आंदोलनात शिवसेना उपजिल्हाप्रमुख, तालुका प्रमुख, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, नगर सेवक, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक व सर्व पदाधिकाºयांनी सहभागी व्हावे असे आवाहन आ. संजय राठोड यांनी केले आहे.
विवाहेच्छुक मुला-मुलींसाठी ‘मॅट्रिमोनी फॉर अॅडॉप्टेड’
‘कम्युनिकेशन सपोर्ट’ व डिजिटल एम्पॉवरमेंट फाउंडेशनचा प्रयोग
पुणे – दत्तक घेतलेल्या मुलाचे किंवा मुलीचे लग्न कसे होणार, हा अनेक पालकांना सतावणारा प्रश्न आता चुटकीसरशी सुटणार आहे. खास दत्तक विवाहेच्छुक मुला-मुलींसाठी ‘मॅट्रिमोनी फॉर अॅडॉप्टेड’ या वेबसाइटची निर्मिती करण्यात आली.कम्युनिकेशन सपोर्ट फाउंडेशन आणि डिजिटल एम्पॉवरमेंट फाउंडेशन या दोन संस्थांनी मिळून या वेबसाइटची निर्मिती केली आहे. दत्तक विवाहेच्छुक मुलांच्या विवाहाचा प्रश्न सोडविण्यासाठीच्या या अभिनव प्रकल्पाची माहिती प्रदीप दीक्षित आणि रवी घाटे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
‘जागतिकीकरण, महिला सक्षमीकरण अशा मुद्द्यांवर चर्चा करणारा समाज दत्तक मुलाचे किंवा मुलीचे स्थळ आल्यावर एक पाऊल मागे जाऊन विचार करू लागतो. लग्नाच्या बाजारात दत्तक मुलींच्या संदर्भात हा प्रश्न अधिकच गंभीर आहे. दत्तक असल्याने विवाह होत नसल्याचे अनेक मुलांच्या बाबतीत पाहण्यात आल्याने हा प्रश्न सोडविण्यासाठी अशा वेबसाइटची निर्मिती होणे ही काळाची गरज होती. ही गरज पूर्ण करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे,’ असे दीक्षित म्हणाले. देशात विवाह नोंदणीच्या असंख्य वेबसाइट इंटरनेटवर उपलब्ध आहेत. मात्र, केवळ दत्तक विवाहेच्छुकांसाठीची ही पहिली वेबसाइट असल्याचा दावा दीक्षित आणि घाटे यांनी केला. दत्तक घेण्याविषयी जागृती वाढत असल्याचे सांगून, दीक्षित यांनी या वेबसाइटमुळे जगभरातील दत्तक विवाहेच्छुक एका व्यासपीठावर येण्यास मदत होणार असल्याचे सांगितले. http://matrimonyforadopted.org/ हा वेबसाइटचा पत्ता आहे.
कसारा घाटात अपघातात ३ ठार
इगतपुरी – मुंबई आग्रा महामार्गावर ठाणे येथून नाशिककडे जाणारी महिंद्र पिकअप दरीत कोसळल्याने तिघांचा मृत्यू झाला तर सात जण जखमी झाले. जखमींपैकी दोघांची प्रकृती गंभीर आहे. मृतांमध्ये एक वर्षीय बालकाचा समावेश आहे. जखमींना नाशिक जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
ठाणे येथून महिंद्र अॅन्ड महिंद्रा कंपनीची नवी कोरी पिकअप गुवाहटी (आसाम) कडे जात होती. कसारा घाटात वाहनचालकाचा ताबा सुटल्याने संरक्षक भिंत तोडून पिकअप १०० ते १५० फूट दरीत कोसळली. या अपघातात कसारा येथील कामडी पाड्यावरील सखाराम वले (वय ४५), चंद्रभागा तुकाराम सदगीर (वय ५५) आणि एक वर्षीय बालकाचा (नाव समजले नाही) मृत्यू झाला. सुनिता दत्तू बेनके (वय 3५), गणेश गायकवाड राहणार बऱ्हाणपूर, खंडू बांगर (वय ५५) खर्डी , वाहनचालक हबीब शेख (वय २६) राहणार चाळीसगाव, भास्कर राठोड (वय ४८) राहणार ढेकू तालुका नांदगाव, आरती वले (वय ४०) कामडीपाडा, कसारा हे प्रवासी अपघातात जखमी झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच मुंबई नाशिक एक्स्प्रेस वे लिमिटेड कंपनीच्या कर्मचा-यांनी जखमींना स्ट्रेचरच्या साहाय्याने बाहेर काढून इगतपुरी शहरातील ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचारासाठी दाखल केले. गंभीर जखमींना नाशिक जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले.
टीईटीच्या परीक्षेचा निकाल शुक्रवारी
मुंबई – राज्यातील शिक्षणाची गुणवत्ता आणि दर्जा वाढविण्यासाठी पहिल्यांदाच १५ डिसेंबर २०१३ रोजी घेण्यात आलेल्या शिक्षक पात्रता परीक्षेचा (टीईटी) निकाल शुक्रवारी, सात मार्च रोजी जाहीर होणार आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या http://mahatet.in या संकेतस्थळावर दुपारी तीन वाजता ऑनलाइन जाहीर होईल अशी माहिती परीक्षा परिषदेचे आयुक्त व्ही.बी. पायमल यांनी ‘प्रहार’शी बोलताना दिली.
टीईटी परीक्षेचा निकाल १५ फेब्रुवारीपर्यंत लागणे अपेक्षित होते, परंतु परीक्षा परिषदेकडून गेल्या काही दिवसांमध्ये तारीख पे तारीख करण्यात आली. यामुळे या परीक्षेला बसलेल्या उमेदवारांमध्ये निकाल कधी लागेल यासाठीची उत्सुकता निर्माण झाली होती. राज्यात घेण्यात आलेल्या टीईटीची पहिलीच परीक्षा सहा लाख २१ हजार ११५ शिक्षक उमेदवारांनी दिली आहे. राज्यातील शाळांमध्ये नव्याने नियुक्त होणा-या या शिक्षकांच्या गुणवत्तेची कसोटी म्हणून टीईटीची ही घेण्यात आलेली पहिलीच परीक्षा आहे. यामुळे या परीक्षेत किती शिक्षक यशस्वी होतील याबाबतची उत्सुकता या शिक्षकांसोबतच सर्व शिक्षणक्षेत्रात निर्माण झाली आहे.
टीईटीच्या निकालासाठी थोडा उशिरा झाला असला तरी त्यासाठीची पूर्ण तयारी करण्यात काही अडचणी होत्या. टीईटीचा निकाल परिषदेच्या या संकेतस्थळावर उपलब्ध होणार असल्याने त्याचे वेळी गुणपत्रिकेसंदर्भातील माहितीही उमेदवारांना उपलब्ध असेल. गुणपडताळणी अथवा काही शंका असल्यास त्यासाठीचीही सर्व माहिती टीईटीच्या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात येणार आहे.
आपच्या १४ कार्यकर्त्यांना अटक
नवी दिल्ली – भाजपच्या नवी दिल्लीतील राष्ट्रीय मुख्यालयाबाहेर आप आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या हाणामारी प्रकरणी दिल्ली पोलिसांनी प्राथमिक तक्रार दाखल करुन, आपच्या चौदा कार्यकर्त्यांना अटक केली आहे. पत्रकारितेतून राजकरणात प्रवेश करणारे आशुतोष आणि शाझिया इल्मी यांच्या विरोधातही तक्रार दाखल केल्याची माहिती पोलिसांनी दिली.
पार्लमेंट स्ट्रीट पोलिस स्टेशनमध्ये बुधवारी रात्री हा गुन्हा दाखल करण्यात आला. दंगल, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान, सरकारी कर्मचा-यांच्या कामकाजात अडथळा आणणे या कलमांखाली गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलिसांनी सुरुवातीला ३३ जणांना ताब्यात घेतले होते त्यातील १४ जणांना अटक करण्यात आली.आपचे प्रमुख नेते अरविंद केजरीवाल यांना बुधवारी गुजरातमध्ये रोड शो करण्यापासून रोखण्यात आले. त्याच्या निषेधार्थ आपचे दिल्लीतील कार्यकर्ते भाजप मुख्यलयाबाहेर प्रदर्शन करत होते. त्यावेळी दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार हाणामारी झाली. केजरीवाल यांना रोखण्याचे लखनऊमध्येही हिंसक पडसाद उमटले. तेथेही दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली.या हाणामारीमध्ये एकूण २८ जण जखमी झाले. यात आपचे तेरा आणि भाजपचे दहा कार्यकर्ते असल्याची माहिती पोलिसांनी दिली. अटक केलेल्या आरोपींनी गुरुवारी दुपारी स्थानिक न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
काँग्रेस गरीबांचा पक्ष – राहुल गांधी
भिवंडी- देशात मनरेगा, अन्नसुरक्षा विधेयक, लोकपाल विधेयक मंजूर करुन काँग्रेसने गरीवांना आधार दिल्याचे काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी गुरुवारी भिवंडी येथे झालेल्या जाहीर सभेत सांगितले. आपला पक्ष श्रीमंतांचा नाही तर गरीबांचा आहे. देश पुढे न्यायचा असेल तर गरिबांचे ऐकावे लागेल, महिलांनाही आता मागे न रहाता प्रत्येक बाबतीत पुढाकार घ्यावा लागेल, असे मतही राहुल यांनी यावेळी व्यक्त केले.
काँग्रेसचे विचार या देशाच्या मातीत रुजले आहेत. काँग्रेसनेच देशातील गरीबांचा विचार करुन देशात मनरेगा, अन्नसुरक्षा विधेयक, लोकपाल विधेयक मंजूर केले. या सगळ्या उपायांमुळे भारतातील गरीबांना काँग्रेसने आधार दिल्याचे राहुल म्हणाले.
महात्मा गांधी आणि सरदार वल्लभभाई पटेल हे काँग्रेसचे नेते होते, त्यांची आरएसएस संदर्भात काय मते होती हे सगळ्यांना माहित आहे, परंतु भाजपाचे नेते लोकांची दिशाभूल करत असल्याचे गांधी म्हणाले. ज्या लोकांनी गांधीजींची हत्या केली, त्याच संघाचा पाठींबा असलेल्या भारतीय जनता पार्टीचे लोक आज गांधीजींच्या नावाचा वापर करत असल्याची टिकाही राहूल गांधी यांनी केली.
आॅटो चालकाच्या खूनातील आरोपीस अटक
यवतमाळ – मादणी बोरगाव येथील आॅटो चालकाच्या खून प्रकरणातील एका आरोपीस शहर पोलिसांनी अटक केली. जिल्हा न्यायालयात हजर करून आरोपीची ९ मार्च पर्र्यंत पोलीस कोठडी मिळविली.
अविनाश देवराव धोटे (४५) रा. सुरभी नगर पिंपळगाव असे आरोपीचे नाव आहे. २४ मार्च रोजी मध्यरात्री दशरथ मारोती मदने (२३) रा. मादणी (बोरगाव) याचा गळा आवळून खून झाला होता. दुसºया दिवशी सकाळी उकंडा शिवारातील जंगलात त्याचा मृतदेह आढळला. यावेळी घटनास्थळावर विषारी औषधीची बॉटल व अन्य साहित्य आढळून आले होते. अनैतिक सबंधातून या युवकाचा खून केल्याची चर्चा आहे. दरम्यान आज शहर पोलिसांनी सदर आरोपीला अटक केली. जिल्हा न्यायालयात हजर करून सदर आरोपीची ९ मार्च पर्र्यंत पोलीस कोठडी मिळविली. अधिक तपास शहरचे ठाणेदार अरुण आगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहा. पोलीस निरीक्षक सि.पी. कडू करीत आहे.
आचार संहितेचे कटाक्षाने पालन करा – जिल्हाधिकाºयांचे निर्देश
यवतमाळ – निवडणूक आयोगाने लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-२०१४ ची घोषणा केली आहे. या निवडणूक कालावधीसाठी आदर्श आचार संहिता जारी करण्यात आली आहे. या आचार संहितेमधील मार्गदर्शक तत्वांचे सर्वांनी कटाक्षाने पालन करावे. असे निर्देश जिल्हाधिकारी अश्विन मुद्गल यांनी आज संबंधित अधिकाºयांना दिलेत. निवडणूक कालावधीमध्ये आचार संहितेचे उल्लंघन होवू नये तसेच गैरप्रकारांना प्रतिबंध करण्यासाठी प्रत्येक विधानसभा मतदार संघात ३ ते ४ भरारी पथकांची, बैठे पथकांची स्थापना करण्यात येत आहे.
यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदार संघाची निवडणूक १० एप्रिल रोजी होत असून १६ मे रोजी मतमोजणी होणार आहे. या काळात आचार संहिता लागू झाली आहे. याच पाश्वर्भुमिवर जिल्हाधिकारी अश्विन मुद्गल यांनी आज गुरुवारी निवडणूकीसंबंधी असलेले नोडल आॅफीसर तसेच जिल्हास्तरीय अधिकाºयांची बैठक घेतली. यावेळी मुख्य कायर्कारी अधिकारी मल्लीनाथ कलशेट्टी, अतिरीक्त जिल्हाधिकारी इंद्रसेन तिटकार, उपजिल्हा निवडणूक अधिकारी नरेंद्र फुलझेले, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र देशमुख, उपविभागीय अधिकारी भागवत डोईफोडे, आदींची बैठकीला प्रमुख उपस्थिती होती. निवडणूक आयोगाने निवडणूक प्रक्रियेमध्ये अनेक परिवर्तन केल असून लोकसभा निवडणुकीत उमेदवारांच्या खर्चावर विशेष लक्ष केंद्रीत करण्यात येत आहे. मतदारांनी निर्भय व नि:पक्षपातीपणे मतदान करण्यासाठी पुढे आले पाहिजे यादृष्टीने जिल्ह्यात मतदार जनजागृती कार्यक्रम राबविण्यात आला. परिणामी १ लाख २३ हजार नवीन मतदारांची भर पडली. निवडणूक कालावधीमध्ये आचार संहितेचे उल्लंघन होवू नये तसेच गैरप्रकारांना प्रतिबंध करण्यासाठी प्रत्येक विधानसभा मतदार संघात ३ ते ४ भरारी पथकांची, बैठे पथकांची स्थापना करण्यात येत आहे. उमेदवारांच्या निवडणूक खर्चाची तपासणी करण्यासाठी लेखा तपासणी चमू प्रत्येक पथकासोबत राहणार आहे. कोठेही गैरप्रकार निदशर्नास आल्यास त्याचा पंचनामा व व्हिडीओग्रॉफीद्वारे चित्रीकरण करण्यात येणार आहे. या निवडणूक प्रक्रियेत नोडल आॅफीसर, सेक्टर आॅफीसर, व अन्य संबंधित अधिकाºयांनी दक्ष रहावे. अशा सुचनाही जिल्हाधिकाºयांनी यावेळी केल्या. आचार संहितेच्या अनुषंगाने सरकारी कार्यालयाच्या, नगर पालीकेंच्या अधिकारातील होर्डिंगचा जाहिरातीसाठी वापर होवू नये याची काळजी घेण्यात यावी. निवडणुकीसाठी अधिग्रहित करण्यात येणारी वाहने सुस्थितीत पाठवावी. ज्या कार्यालयांनी निवडणूक कामासाठी कमर्चाºयाची यादी अद्याप सादर केली नाही ती यादी तात्काळ सादर करण्यात यावी. कोणत्याही अधिकारी कमर्चाºयास दिघर्काळासाठी रजा मंजूर करु नये,पुर्व परवानगी शिवाय मुख्यालय सोडू नये असेही जिल्हाधिकाºयांनी यावेळी सांगितले. या बैठकीत अतिरीक्त जिल्हाधिकारी इंद्रसेन तिटकारे यांनी आचार संहितेबाबत माहिती दिली.
0
भारताचा अफगाणिस्तानवर आठ गडी राखून विजय
मिरपूर- आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत भारताने अफगाणिस्तानवर आठ गडी राखून दमदार विजय मिळवला आहे. अफगाणिस्तानने ठेवलेले १६० धावांचे आव्हान भारताने दोन गड्यांच्या मोबदल्यात ३२.२ षटकात पूर्ण केले.
भारताकडून पहिल्या विकेटसाठी शिखर धवन आणि अंजिक्य रहाणेने सर्वाधिक १२१ धावांची भागीदारी केली. १२१ धावा झाल्यानंतर भारताच्या पहिल्या खेळाडूला बाद करण्यात अफगाणिस्तानच्या गोलंदाजांना यश आले. अजिंक्य रहाणे मिरवासच्या गोलंदाजीवर ५६ धावा करुन बाद झाला. त्यानंतर लगेचच शिखर धवन ६० धावा करुन तंबूत परतला. त्यानंतर आलेल्या रोहित शर्मा (१८) आणि दिनेश कार्तिक (२१) यांनी अफगाणिस्तानचे १६० धावांचे तुटपुंजे आव्हान ३२ षटकातच पूर्ण केले. अफगाणिस्तानच्या मिरवास आणि मोहम्मद नाबी यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.
यापूर्वी भारताने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. फलंदाजीसाठी आलेल्या अफगाणिस्तानची सुरुवात थोडी अ़डखळतच झाली. भारतीय गोलंदाजांपुढे अफगाणिस्तानच्या फलंदाजांची पुरती भंबेरी उडाली. ३० धावा झाल्या तेव्हा त्यांचा पहिला फलंदाज तंबूत परतला. त्यानंतर टप्पाटप्प्याने अफगाणिस्तानचे फलंदाज बाद होत गेले. शेनवरी(५०), नूर अली(३१) ,शहाजहाद(२२) आणि दवलत(१४) यांच्याशिवाय एकाही फलंदाजाला दुहेरी धावसंख्याही करता आली नाही. मंगल आणि नूर अली या जोडीला पहिल्या विकेटसाठी सर्वीधिक ३० धावांची भागीदारी करता आली. भारताकडून रविद्र जडेजाने सर्वाधिक चार बळी घेतले. तर आर. अश्विन(३), शामी(२) आणि मिश्रा(१) गडी बाद केले.
0














